शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

लहान मुले जीवानिशी गेली, कुटुंबांना दु:ख आवरेना; CBI चौकशी करण्यासाठी याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 07:49 IST

हाथरसच्या चेंगराचेंगरीतील मृतांमध्ये मुले आणि महिला अधिक, चेंगराचेंगरीत बहुतेक लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी एटा जिल्ह्यात पाठविण्यात आलेल्या मृतदेहांच्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

हाथरस : ‘सत्संग’ आटोपून सत्येंद्र यादव हा आपल्या वाहनाकडे जात असताना त्यांच्या पत्नीने त्यांना रडत रडत फोन करून सांगितले की, काही वेळापूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत त्यांचा तीन वर्षांचा मुलगा ‘छोटा’ मरण पावला आहे.

पेशाने ड्रायव्हर असलेला २९ वर्षीय यादव हा आपल्या आई आणि दोन वहिनी आणि कुटुंबासह विश्वहारी सत्संगासाठी दिल्लीहून आला होता. कार्यक्रम संपण्यापूर्वीच, तो, त्याची आई आणि मोठा मुलगा मयंक (४ वर्षीय) सोबत वाहनाकडे गेले होते. मात्र त्याच्या पत्नीने फोनवर मुलगा गेल्याचे सांगताच त्याला मोठा धक्का बसला.

रोविनच्या कुटुंबाप्रमाणेच इतर अनेक कुटुंबे आहेत ज्यांनी या दुःखद घटनेत आपली मुले गमावली आहेत. भाऊ, बहिणीचा शेवटचा प्रवासआयुष (९) आणि काव्या (३) नावाच्या भाऊ आणि बहिणीसाठी, जयपूर ते कार्यक्रमस्थळापर्यंतचा प्रवास त्यांचा शेवटचा प्रवास ठरला. त्यांच्या वडिलांना अद्याप ही बातमी सांगितलेली नाही. त्यांना मोठा आघात होईल, अशी भीती असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, या दुर्घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी याचिका अलाहाबाद कोर्टात दाखल करण्यात आली आहे. 

बहिणीच्या शोधासाठी...चेंगराचेंगरीनंतर राकेशकुमार याची बहीण हरबेजी देवी या बेपत्ता आहेत. त्याने सांगितले की, या दुर्घटनेत जीव गमावलेल्या १००हून अधिक लोकांचे मी मृतदेह बघितले; पण त्यातूनही माझ्या बहिणीचा पत्ता लागलेला नाही. त्यांनी आपल्या बहिणीच्या शोधासाठी हाथरस, इटाह, अलिगढ येथील शवागारेही पालथी घातली. मात्र तिथेही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

मृत्यू नेमका कशामुळे?चेंगराचेंगरीत बहुतेक लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी एटा जिल्ह्यात पाठविण्यात आलेल्या मृतदेहांच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. जवळपास सर्व प्रकरणांमध्ये गुदमरणे हे मृत्यूचे कारण असल्याचे आढळून आले आहे. मृतांमध्ये बहुतांश ४० ते ५० वयोगटातील महिला आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले. 

चेंगराचेंगरी का?‘भोले बाबा’च्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनुयायांना धक्का दिल्याने गोंधळ उडाला. पावसामुळे तेथे निसरडा उतार झाला होता, यामुळे चेंगराचेंगरी झाली, असे (एसडीएमच्या अहवालातून समोर आले आहे. बाबांच्या पायाची धूळ त्यांच्या कपाळावर लावायला भक्तांनी सुरुवात केली, इतरही भक्त त्यांच्याकडे धावू लागले. यावेळी बाबांचे वैयक्तिक ब्लॅक कमांडोेंनी धक्काबुक्की केली. यात काही लोक खाली पडले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि जमाव नियंत्रणाबाहेर गेला. बहुतेक लोक उतारामुळे घसरले आणि पडले. जे पडले ते उठू शकले नाहीत आणि मागून येणाऱ्या लोकांमुळे ते चिरडले गेल्याचे अहवालात म्हटले आहे.