शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुले जीवानिशी गेली, कुटुंबांना दु:ख आवरेना; CBI चौकशी करण्यासाठी याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 07:49 IST

हाथरसच्या चेंगराचेंगरीतील मृतांमध्ये मुले आणि महिला अधिक, चेंगराचेंगरीत बहुतेक लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी एटा जिल्ह्यात पाठविण्यात आलेल्या मृतदेहांच्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

हाथरस : ‘सत्संग’ आटोपून सत्येंद्र यादव हा आपल्या वाहनाकडे जात असताना त्यांच्या पत्नीने त्यांना रडत रडत फोन करून सांगितले की, काही वेळापूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत त्यांचा तीन वर्षांचा मुलगा ‘छोटा’ मरण पावला आहे.

पेशाने ड्रायव्हर असलेला २९ वर्षीय यादव हा आपल्या आई आणि दोन वहिनी आणि कुटुंबासह विश्वहारी सत्संगासाठी दिल्लीहून आला होता. कार्यक्रम संपण्यापूर्वीच, तो, त्याची आई आणि मोठा मुलगा मयंक (४ वर्षीय) सोबत वाहनाकडे गेले होते. मात्र त्याच्या पत्नीने फोनवर मुलगा गेल्याचे सांगताच त्याला मोठा धक्का बसला.

रोविनच्या कुटुंबाप्रमाणेच इतर अनेक कुटुंबे आहेत ज्यांनी या दुःखद घटनेत आपली मुले गमावली आहेत. भाऊ, बहिणीचा शेवटचा प्रवासआयुष (९) आणि काव्या (३) नावाच्या भाऊ आणि बहिणीसाठी, जयपूर ते कार्यक्रमस्थळापर्यंतचा प्रवास त्यांचा शेवटचा प्रवास ठरला. त्यांच्या वडिलांना अद्याप ही बातमी सांगितलेली नाही. त्यांना मोठा आघात होईल, अशी भीती असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, या दुर्घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी याचिका अलाहाबाद कोर्टात दाखल करण्यात आली आहे. 

बहिणीच्या शोधासाठी...चेंगराचेंगरीनंतर राकेशकुमार याची बहीण हरबेजी देवी या बेपत्ता आहेत. त्याने सांगितले की, या दुर्घटनेत जीव गमावलेल्या १००हून अधिक लोकांचे मी मृतदेह बघितले; पण त्यातूनही माझ्या बहिणीचा पत्ता लागलेला नाही. त्यांनी आपल्या बहिणीच्या शोधासाठी हाथरस, इटाह, अलिगढ येथील शवागारेही पालथी घातली. मात्र तिथेही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

मृत्यू नेमका कशामुळे?चेंगराचेंगरीत बहुतेक लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी एटा जिल्ह्यात पाठविण्यात आलेल्या मृतदेहांच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. जवळपास सर्व प्रकरणांमध्ये गुदमरणे हे मृत्यूचे कारण असल्याचे आढळून आले आहे. मृतांमध्ये बहुतांश ४० ते ५० वयोगटातील महिला आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले. 

चेंगराचेंगरी का?‘भोले बाबा’च्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनुयायांना धक्का दिल्याने गोंधळ उडाला. पावसामुळे तेथे निसरडा उतार झाला होता, यामुळे चेंगराचेंगरी झाली, असे (एसडीएमच्या अहवालातून समोर आले आहे. बाबांच्या पायाची धूळ त्यांच्या कपाळावर लावायला भक्तांनी सुरुवात केली, इतरही भक्त त्यांच्याकडे धावू लागले. यावेळी बाबांचे वैयक्तिक ब्लॅक कमांडोेंनी धक्काबुक्की केली. यात काही लोक खाली पडले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि जमाव नियंत्रणाबाहेर गेला. बहुतेक लोक उतारामुळे घसरले आणि पडले. जे पडले ते उठू शकले नाहीत आणि मागून येणाऱ्या लोकांमुळे ते चिरडले गेल्याचे अहवालात म्हटले आहे.