शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भरधाव ट्रकनं आंदोलक शेतकरी महिलांना चिरडलं; ३ मृत्यूमुखी, ३ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 09:47 IST

हरयाणात तीन आंदोलक महिलांचा अपघाती मृत्यू; तिघींची प्रकृती गंभीर

बहादूरगढ: हरयाणाच्या बहादूरगढमध्ये अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रकनं आंदोलक शेतकरी महिलांना चिरडलं आहे. यामध्ये तीन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला असून तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.

आज सकाळी साडे सहा वाजता झज्जर रोडवर अपघात झाला. वृद्ध महिला रस्त्यावर असलेल्या दुभाजकावर बसल्या होत्या. तितक्यात एक भरधाव ट्रक आला. या ट्रकनं महिलांना चिरडलं. दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे. 

दुभाजकावर बसलेल्या महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मृत्यूमुखी पडलेल्या तिन्ही महिला पंजाबच्या मानसा जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. घरी जाण्यासाठी महिला रिक्षाची वाट पाहत होत्या. त्यासाठी त्या दुभाजकावर बसल्या होत्या. तितक्यात झज्जर रोडवर उड्डाणपुलाच्या खाली एका भरधाव ट्रकनं त्यांना चिरडलं. अपघातानंतर परिसरात खळबळ माजली. पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबर २०२० पासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यामध्ये पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. या महिलादेखील त्याच आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आंदोलक शेतकरी टप्प्याटप्प्यानं घरी जातात. वृद्ध महिला आंदोलन स्थळावरून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र त्याआधी त्यांना मृत्यूनं गाठलं.