शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

Haryana assembly elections 2019: आखाड्यात ४२% उमेदवार कोट्यधीश; ११७ जणांवर गुन्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 07:58 IST

२०१४ च्या तुलनेत गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांची संख्या ३ टक्के अधिक आहे.

नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या एकूण उमेदवारांपैकी ४२ टक्के उमेदवार कोट्यधीश असून, १० टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे आहेत. १,१३८ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर असोसिएशन आॅफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार ४८१ उमेदवार कोट्यधीश आहेत, तर ११७ उमेदवारांवर गुन्हे आहेत.

२०१४ च्या तुलनेत गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांची संख्या ३ टक्के अधिक आहे. यावेळी हरयाणा विधानसभेची निवडणूक एकूण ७४ राजकीय पक्ष लढवीत आहेत. २०१४ मध्ये ४३ राजकीय पक्षांनी उमेदवार उतरविले होते. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी येत्या २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत असून, ७४ राजकीय पक्षांचे एकूण १,१६९ उमेदवार नशीब अजमावत आहेत. २०१४ ची निवडणूक ४३ पक्षांनी एकमेकांविरुद्ध लढविली होती.

यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या कोट्यधीश ४८१ उमेदवारांची एकूण संपत्ती सरासरी ४ कोटी ३१ लाख रुपये आहे. याचाच अर्थ ४२ टक्के उमेदवारांनी आपली संपत्ती एक कोटीपेक्षा अधिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात घोषित केले आहे. राजकीय पक्षनिहाय काँग्रेसचे ७९, भाजपचे ७९, जेजेपीचे ६२, आयएनएलडीचे ८० आणि बसपाचे ३४ उमेदवार कोट्यधीश आहेत.

गुन्हे असलेले ११७ उमेदवारयावेळी निवडणूक लढविणांऱ्यापैकी १० टक्के म्हणजे ११७ उमेदवारांनी आपल्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती दिली आहे. ७० उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत. यात काँग्रेसचे २२, भाजपचे ४, जजपाचे १६, आयएनएलडीचे १२ आणि बसपाच्या २१ उमेदवारांचा समावेश आहे.

निरक्षर ते उच्चशिक्षित उमेदवार रिंगणातनिरक्षर ते उच्चशिक्षित उमेदवार निवडणूक लढवीत असून, ५७४ उमेदवार ५ वी आणि १२ वी उत्तीर्ण आहेत. ४८४ उमेदवार पदवीधर किंवा अधिक शिक्षित आहेत. ३५ उमेदवार पदविकाधारक असून, १९ उमेदवार साक्षर असून, २५ निरक्षर आहेत. उमेदवारांचे वयोमान २५ ते ८० वर्षांदरम्यान आहे.बेरोजगारीवर भाजप गप्प का?चंदीगड : बेरोजगारीसारख्या ज्वलंत मुद्यावर भाजप का गप्प आहे? असा सवाल जनता भाजपला विचारत आहे. जनतेने भाजपला यावेळी बाहेरचा रस्ता दाखविण्याचा चंग बांधला आहे, असा दावा हरयाणा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष कुमारी शैलजा यांनी केला आहे.खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार अनेक घोटाळ्यांत अडकले आहे. अनुच्छेद ३७० ला भाजप निवडणुकीत मोठा मुद्दा बनविला आहे. यावर त्या म्हणाल्या की, हा डाव त्यांच्यावर उलटेल. कारण बेरोजगारीसारख्या मुद्यांवर भाजप मूग गिळून का? असा सवाल जनता विचारत आहे. हरयाणात काँग्रेसचे सरकार येईल, अशी ठाम आशा आहे.

टॅग्स :HaryanaहरयाणाElectionनिवडणूक