शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
4
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
5
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
6
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
7
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
8
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
9
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
10
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
11
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
12
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
13
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण
14
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
15
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
16
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
17
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
18
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
19
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
20
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान

Haryana assembly elections 2019: आखाड्यात ४२% उमेदवार कोट्यधीश; ११७ जणांवर गुन्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 07:58 IST

२०१४ च्या तुलनेत गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांची संख्या ३ टक्के अधिक आहे.

नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या एकूण उमेदवारांपैकी ४२ टक्के उमेदवार कोट्यधीश असून, १० टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे आहेत. १,१३८ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर असोसिएशन आॅफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार ४८१ उमेदवार कोट्यधीश आहेत, तर ११७ उमेदवारांवर गुन्हे आहेत.

२०१४ च्या तुलनेत गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांची संख्या ३ टक्के अधिक आहे. यावेळी हरयाणा विधानसभेची निवडणूक एकूण ७४ राजकीय पक्ष लढवीत आहेत. २०१४ मध्ये ४३ राजकीय पक्षांनी उमेदवार उतरविले होते. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी येत्या २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत असून, ७४ राजकीय पक्षांचे एकूण १,१६९ उमेदवार नशीब अजमावत आहेत. २०१४ ची निवडणूक ४३ पक्षांनी एकमेकांविरुद्ध लढविली होती.

यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या कोट्यधीश ४८१ उमेदवारांची एकूण संपत्ती सरासरी ४ कोटी ३१ लाख रुपये आहे. याचाच अर्थ ४२ टक्के उमेदवारांनी आपली संपत्ती एक कोटीपेक्षा अधिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात घोषित केले आहे. राजकीय पक्षनिहाय काँग्रेसचे ७९, भाजपचे ७९, जेजेपीचे ६२, आयएनएलडीचे ८० आणि बसपाचे ३४ उमेदवार कोट्यधीश आहेत.

गुन्हे असलेले ११७ उमेदवारयावेळी निवडणूक लढविणांऱ्यापैकी १० टक्के म्हणजे ११७ उमेदवारांनी आपल्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती दिली आहे. ७० उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत. यात काँग्रेसचे २२, भाजपचे ४, जजपाचे १६, आयएनएलडीचे १२ आणि बसपाच्या २१ उमेदवारांचा समावेश आहे.

निरक्षर ते उच्चशिक्षित उमेदवार रिंगणातनिरक्षर ते उच्चशिक्षित उमेदवार निवडणूक लढवीत असून, ५७४ उमेदवार ५ वी आणि १२ वी उत्तीर्ण आहेत. ४८४ उमेदवार पदवीधर किंवा अधिक शिक्षित आहेत. ३५ उमेदवार पदविकाधारक असून, १९ उमेदवार साक्षर असून, २५ निरक्षर आहेत. उमेदवारांचे वयोमान २५ ते ८० वर्षांदरम्यान आहे.बेरोजगारीवर भाजप गप्प का?चंदीगड : बेरोजगारीसारख्या ज्वलंत मुद्यावर भाजप का गप्प आहे? असा सवाल जनता भाजपला विचारत आहे. जनतेने भाजपला यावेळी बाहेरचा रस्ता दाखविण्याचा चंग बांधला आहे, असा दावा हरयाणा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष कुमारी शैलजा यांनी केला आहे.खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार अनेक घोटाळ्यांत अडकले आहे. अनुच्छेद ३७० ला भाजप निवडणुकीत मोठा मुद्दा बनविला आहे. यावर त्या म्हणाल्या की, हा डाव त्यांच्यावर उलटेल. कारण बेरोजगारीसारख्या मुद्यांवर भाजप मूग गिळून का? असा सवाल जनता विचारत आहे. हरयाणात काँग्रेसचे सरकार येईल, अशी ठाम आशा आहे.

टॅग्स :HaryanaहरयाणाElectionनिवडणूक