शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

हर्षवर्धन पाटलांपुढे महाआघाडीचे आव्हान

By admin | Updated: September 18, 2014 12:59 IST

यंदाच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्याच्या विकासाचा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक प्रश्न गेल्या काही वर्षापासून सुटले नसल्याचा आरोप होत आहे.

पुणो :  यंदाच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्याच्या विकासाचा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक प्रश्न गेल्या काही वर्षापासून सुटले नसल्याचा आरोप होत आहे.  सहकार मंत्री  हर्षवर्धन पाटील यांना या  स्थानिक प्रश्नांनीच ग्रासले आहे. 2क्क्9 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणो यांनी महाआघाडीच्या माध्यमातून तुल्यबळ लढत दिली. पाटील यांना निसटता विजय मिळवता आला. परंतु, यंदा स्थानिक प्रश्न निवडणुकीच्या रणधुमाळीत चर्चीले जाऊ लागल्याने पाटील यांच्यापुढे महाआघाडीचे मोठे  आव्हान आहे. 
नगरपालिकेची सत्ता असतानाही शहरातील बकालपणा कमी करण्यासाठी कोणत्याही उपाय योजना केल्या नाहीत. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थानिक पुढा:यांकडूनच हर्षवर्धन पाटील यांना यंदाही आव्हान मिळू शकते. महाआघाडीच्या प्रयोगाबरोबरच काही मंडळी थेट भाजपात प्रवेश करून पाटील यांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय भरणो, जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्यापैकी कोणीतरी पाटील यांच्या विरोधात   रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. जातीय समिकरणात धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील विरोधकांकडून तापविण्यात येत आहे. 2क्क्9 पासून इंदापूर तालुक्यात घट्ट झालेले  जातीय राजकारण आणि  त्यातच धनगर आरक्षणाचे आंदोलन यामुळे कॉँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. 
कॉँग्रेस बरोबर राष्ट्रवादीची आघाडी झाली  तरी राष्ट्रवादीचा इंदापूर तालुक्यातील मोठा गट हर्षवर्धन पाटील यांचे कामच करीत नाही. याचा प्रत्यय 2क्क्9 च्या निवडणूकीत आला होता.
 इंदापूर तालुक्यातही अनेक प्रश्न आहेत. निरा भीमा स्थिरीकरण योजनेसह सिंचनाचे प्रकल्प रखडले आहेत.
 बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी औद्योगिक वसाहतीत मोठे प्रकल्प आलेले नाहीत. क् वर्षापासून एमआयडीसीसाठी घेतलेली जागा पडून आहे. काही छोटे प्रकल्प वगळता एमआयडीसीत रोजगार निर्मितीसाठी काही झाले नाही. फक्त कुरघुडय़ांचे राजकारण झाले आहे. त्याचे उत्तर हर्षवर्धन पाटील  यांना यंदाच्या निवडणुकीत द्यावे लागणार आहे.  (वार्ताहर)
 
इंदापूरकरांचा सतत दुष्काळाशी सामना
हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याचा सर्वागिण विकासासाठी फारसे लक्ष दिले नाही, असा विरोधकांचा आरोप आहे.  सर्व सत्ताकेंद्रावर घरातील मंडळींचा प्रभाव ठेवला. मागील 2क् वर्षापासून पंचतारांकीत एमआयडीसीत मोठे प्रकल्प आले नाहीत. 22 गावांना बारमाही पाणी प्रश्न सोडविण्यासाठी गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे या गावांना पाणीटंचाईचा दरवर्षी सामना करावा लागतो. त्याच बरोबर लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना दर पाच वर्षात निवडणूूक प्रचार काळात मार्गी लावू, असे पाटील यांनी आश्वासन दिले. या भागात सतत दुष्काळाशी सामना शेतकरी, ग्रामस्थ करीत आहेत.