शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी साजरा केला हरेली तिहार; म्हणाले, "शेतकऱ्यांना समृद्धी करणे हीच आमची प्राथमिकता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 10:21 IST

छत्तीसगडच्या रायपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोठ्या थाटामाटात हरेली सण साजरा करण्यात आला.

CG Hareli Tihar 2024:छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी ४ ऑगस्ट रोजी शासकीय निवासस्थानी हरेली तिहार उत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आणि कार्यक्रमाला उपस्थित लोकांना संबोधित केले. छत्तीसगढच्या लोकसंस्कृतीचा पहिला सण असलेल्या हरेलीनिमित्ताने मुख्यमंत्री विष्णू देव साय आणि त्यांची पत्नी कौशल्या देवी साय यांनी गौरी-गणेश पूजा केली आणि भगवान शंकराला अभिषेक केला. मुख्यमंत्री साय यांनी नांगर, रापा, कुदळ आणि कृषी अवजारांची विधीवत पूजा करून राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

शेतकऱ्यांना सुख-समृद्धी आणणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी यावेळी सांगितले. आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य शेतकऱ्यांना सुख आणि समृद्धी मिळवून देणे आहे. छत्तीसगड हे कृषीप्रधान राज्य आहे, जिथे ८० टक्के लोकसंख्या  उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे, असे मुख्यमंत्री साय म्हणाले. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांवर मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला.

मुख्यमंत्री साय यांनी डॉ. रमणसिंग यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले. "रमण सिंह यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठीच्या कल्याणकारी योजनांवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना कृषी कर्जावर शून्य टक्के व्याज सारख्या सुविधा मिळाल्या. राज्य सरकार आता शेतकऱ्यांकडून प्रति एकर २१ क्विंटल धान ३१०० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करत आहे," असेही मुख्यमंत्री साय यांनी सांगितले.

यावेळी कृषी विभागाने आयोजित केलेल्या प्रगत कृषी उपकरणांच्या प्रदर्शनाला मु्ख्यमंत्री साय यांनी भेट दिली. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी २३ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि इतर कृषी उपकरणांच्या चाव्यांचे वाटप केले. विधानसभा अध्यक्ष डॉ. रमण सिंह, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, कृषिमंत्री रामविचार नेताम, खासदार ब्रिजमोहन अग्रवाल, आमदार किरण सिंह देव आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कौशल्या देवी साई यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. राज्याच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री साय यांच्या समर्पणाचे कौतुक करताना डॉ. रमण सिंह म्हणाले की, चांगला पाऊस हा दैवी आशीर्वाद असतो. मुख्यमंत्री साय यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांचेही रमण सिंह यांनी कौतुक केले.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड