शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी साजरा केला हरेली तिहार; म्हणाले, "शेतकऱ्यांना समृद्धी करणे हीच आमची प्राथमिकता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 10:21 IST

छत्तीसगडच्या रायपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोठ्या थाटामाटात हरेली सण साजरा करण्यात आला.

CG Hareli Tihar 2024:छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी ४ ऑगस्ट रोजी शासकीय निवासस्थानी हरेली तिहार उत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आणि कार्यक्रमाला उपस्थित लोकांना संबोधित केले. छत्तीसगढच्या लोकसंस्कृतीचा पहिला सण असलेल्या हरेलीनिमित्ताने मुख्यमंत्री विष्णू देव साय आणि त्यांची पत्नी कौशल्या देवी साय यांनी गौरी-गणेश पूजा केली आणि भगवान शंकराला अभिषेक केला. मुख्यमंत्री साय यांनी नांगर, रापा, कुदळ आणि कृषी अवजारांची विधीवत पूजा करून राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

शेतकऱ्यांना सुख-समृद्धी आणणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी यावेळी सांगितले. आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य शेतकऱ्यांना सुख आणि समृद्धी मिळवून देणे आहे. छत्तीसगड हे कृषीप्रधान राज्य आहे, जिथे ८० टक्के लोकसंख्या  उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे, असे मुख्यमंत्री साय म्हणाले. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांवर मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला.

मुख्यमंत्री साय यांनी डॉ. रमणसिंग यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले. "रमण सिंह यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठीच्या कल्याणकारी योजनांवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना कृषी कर्जावर शून्य टक्के व्याज सारख्या सुविधा मिळाल्या. राज्य सरकार आता शेतकऱ्यांकडून प्रति एकर २१ क्विंटल धान ३१०० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करत आहे," असेही मुख्यमंत्री साय यांनी सांगितले.

यावेळी कृषी विभागाने आयोजित केलेल्या प्रगत कृषी उपकरणांच्या प्रदर्शनाला मु्ख्यमंत्री साय यांनी भेट दिली. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी २३ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि इतर कृषी उपकरणांच्या चाव्यांचे वाटप केले. विधानसभा अध्यक्ष डॉ. रमण सिंह, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, कृषिमंत्री रामविचार नेताम, खासदार ब्रिजमोहन अग्रवाल, आमदार किरण सिंह देव आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कौशल्या देवी साई यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. राज्याच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री साय यांच्या समर्पणाचे कौतुक करताना डॉ. रमण सिंह म्हणाले की, चांगला पाऊस हा दैवी आशीर्वाद असतो. मुख्यमंत्री साय यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांचेही रमण सिंह यांनी कौतुक केले.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड