शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी साजरा केला हरेली तिहार; म्हणाले, "शेतकऱ्यांना समृद्धी करणे हीच आमची प्राथमिकता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 10:21 IST

छत्तीसगडच्या रायपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोठ्या थाटामाटात हरेली सण साजरा करण्यात आला.

CG Hareli Tihar 2024:छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी ४ ऑगस्ट रोजी शासकीय निवासस्थानी हरेली तिहार उत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आणि कार्यक्रमाला उपस्थित लोकांना संबोधित केले. छत्तीसगढच्या लोकसंस्कृतीचा पहिला सण असलेल्या हरेलीनिमित्ताने मुख्यमंत्री विष्णू देव साय आणि त्यांची पत्नी कौशल्या देवी साय यांनी गौरी-गणेश पूजा केली आणि भगवान शंकराला अभिषेक केला. मुख्यमंत्री साय यांनी नांगर, रापा, कुदळ आणि कृषी अवजारांची विधीवत पूजा करून राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

शेतकऱ्यांना सुख-समृद्धी आणणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी यावेळी सांगितले. आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य शेतकऱ्यांना सुख आणि समृद्धी मिळवून देणे आहे. छत्तीसगड हे कृषीप्रधान राज्य आहे, जिथे ८० टक्के लोकसंख्या  उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे, असे मुख्यमंत्री साय म्हणाले. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांवर मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला.

मुख्यमंत्री साय यांनी डॉ. रमणसिंग यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले. "रमण सिंह यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठीच्या कल्याणकारी योजनांवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना कृषी कर्जावर शून्य टक्के व्याज सारख्या सुविधा मिळाल्या. राज्य सरकार आता शेतकऱ्यांकडून प्रति एकर २१ क्विंटल धान ३१०० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करत आहे," असेही मुख्यमंत्री साय यांनी सांगितले.

यावेळी कृषी विभागाने आयोजित केलेल्या प्रगत कृषी उपकरणांच्या प्रदर्शनाला मु्ख्यमंत्री साय यांनी भेट दिली. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी २३ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि इतर कृषी उपकरणांच्या चाव्यांचे वाटप केले. विधानसभा अध्यक्ष डॉ. रमण सिंह, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, कृषिमंत्री रामविचार नेताम, खासदार ब्रिजमोहन अग्रवाल, आमदार किरण सिंह देव आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कौशल्या देवी साई यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. राज्याच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री साय यांच्या समर्पणाचे कौतुक करताना डॉ. रमण सिंह म्हणाले की, चांगला पाऊस हा दैवी आशीर्वाद असतो. मुख्यमंत्री साय यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांचेही रमण सिंह यांनी कौतुक केले.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड