शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारपुढे लोकपाल निवडीचे महाकठीण काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:34 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रिया पार पडल्यास तो ठरेल चमत्कार!

- हरीश गुप्तानवी दिल्ली : देशाच्या पहिल्या लोकपालाची निवड करण्याचे काम हे मोदी सरकारसाठी खूपच गुंतागुंतीचे व मोठे आव्हान ठरणार आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या आधी लोकपाल मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. पंतप्रधान मोदी, सरन्यायाधीश दीपक मिश्रा, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि ख्यातनाम विधिज्ञ मुकुल रोहटगी यांचा समावेश असलेल्या लोकपाल निवड समितीच्या पहिल्या बैठकीतच हे काम किती कठीण आहे हे स्पष्ट झाले होते.१९ जुलै रोजी ही बैठक शोध समिती स्थापन करण्यासाठी झाली. लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या बैठकीला त्यांना पूर्ण सदस्य म्हणून न बोलावता ‘विशेष निमंत्रित’ म्हणून बोलावल्यामुळे उपस्थित राहण्यास नकार दिला होता. तरीही निवड समितीने बैठक घ्यायचा निर्णय घेतला होता. पंतप्रधानांसह सर्व सदस्यांनी प्रत्येकाने पाच तज्ज्ञांची नावे पुढील बैठकीत सूचवावीत, असे ठरवण्यात आले. एवढेच काय खरगे यांनाही पाच नावे सूचवण्यास विनंती केली जाईल. या २५ तज्ज्ञांच्या यादीतून लोकपाल शोध समितीची स्थापना केली जाईल. या २५ जणांतून या शोध समितीत आठ जणांचा समावेश केला जाईल. विशेष म्हणजे लोकपाल निवड समितीच्या पहिल्या बैठकीला जे चार सदस्य हजर होते त्यांनाही लोकपाल शोध समितीचे सदस्य बनू शकतील अशा सक्षम पाच लोकांची नावे निवडण्यात अडचणी आल्या. दोन सदस्यांना नावे शोधण्यासाठी वेळ हवा असल्याचे जाणवले तेव्हा मोदी यांनी त्यांच्याकडे पाहिले. सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ निवडले जावेत व त्यांच्यातून मग आठ नावे निवडावीत अशी सूचना रोहटगी यांनी केल्याचे समजते. मल्लिकार्जुन खरगे भलेही बैठकीला हजर राहणार नाहीत तरी त्यांनी नावे पाठवावीत अशी विशेष विनंती सरकार त्यांना करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सरकारला झटकल्यामुळे लोकपाल निवड समितीची पुढील बैठक सरकार कधी घेणार हे स्पष्ट नाही.मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीतही उभी राहिली होती आव्हानेही प्रक्रियाही अवघड असल्यामुळे ती कोणत्याही वेळी पूर्ण होईल हे शक्य नाही. त्याचे कारण म्हणजे आठ सदस्यांची शोध समिती नऊ सदस्यांच्या लोकपाल मंडळासाठी वृत्तपत्रांत योग्य ती जाहिरात देऊन संपूर्ण देशातून अर्ज मागवेल. ही अशीच प्रक्रिया मनमोहनसिंग सरकारने २०१३ मध्ये लोकपाल आणि लोकायुक्त कायदा संमत झाल्यावर केली होती. फेब्रुवारी २०१४ मध्ये न्यायमुर्ती के. टी. थॉमस यांच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यांची शोध समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने लोकपालसाठी अर्ज मागवले होते. ३०० जणांनी अर्ज केलाही. परंतु थॉमस यांनी अचानक ती जबाबदारी सोडली व त्यामुळे प्रक्रिया थांबली. नरेंद्र मोदी यांचे सरकार त्याच्या राहिलेल्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करू शकले तर तो चमत्कारच समजावा लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार