शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

आंध्र प्रदेशात रॅगिंगप्रकरणी ५४ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर कडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 14:29 IST

आंध्र प्रदेशच्या राजीव गांधी माहिती आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील ५४ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून कडक  कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे आंध्र प्रदेशच्या राजीव गांधी माहिती आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील ५४ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून कडक  कारवाई करण्यात आली आहे. . गेल्या महिन्यात विद्यापीठात शिकणाऱ्या काही सिनिअर विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांचं रॅगिंग केल्याचा प्रकार घडला होता.सर्व विद्यार्थ्यांवर सोमवारी विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली.

हैदराबाद, दि. 19- आंध्र प्रदेशच्या राजीव गांधी माहिती आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील ५४ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून कडक  कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात विद्यापीठात शिकणाऱ्या काही सिनिअर विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांचं रॅगिंग केल्याचा प्रकार घडला होता. या सर्व विद्यार्थ्यांवर सोमवारी विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

२९ ऑगस्ट रोजी विद्यापाठीतील सिनिअर विद्यार्थ्यांनी १२ ज्युनिअर विद्यार्थ्यांना एका रूममध्ये नेऊन त्यांना शिक्षा दिली होती. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. काही विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागंल. त्यानंतर पीडित विद्यार्थ्यांनी या सगळ्याविरोधात तक्रार विद्यापीठ व्यवस्थापनाकडे केली होती. या प्रकरणी विद्यापीठाच्या एका समितीकडून चौकशी झाल्यावर 54 विद्यार्थी दोषी आढळले होते. चौकशी समितीने दोषी विद्यार्थांना निलंबित करण्याची सूचना केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने सांगितलं. निलंबित करण्यात आलेले विद्यार्थी विद्यापीठात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षात शिकत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

दोषी विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थांना वर्षभरासाठी वर्गात हजेरी लावता येणार नाही. त्याचबरोबर त्यांना वार्षिक परीक्षाही देता येणार नाही. इतर नऊ विद्यार्थांना एका वर्षासाठी महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलं आहे. पण, त्यांना वार्षिक परीक्षा देता येणार आहे. तसंच इतर १३ विद्यार्थ्यांवर नोव्हेंबरपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर उरलेल्या २४ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आलं असल्याचं विद्यापीठाचे रजिस्ट्रार व्ही. व्यंकट दास यांनी सांगितलं. 

देशात २००९ मध्ये रॅगिंगविरोधी कायदा लागू करण्यात आला होता. त्याचबरोबर रॅगिंगसंबंधी कुठलीही तक्रार आणि मदतीसाठी सरकारने यंत्रणा उभारली होती. तरीही रॅगिंगचे प्रकार थांबले नाहीत.