शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

आंध्र प्रदेशात रॅगिंगप्रकरणी ५४ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर कडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 14:29 IST

आंध्र प्रदेशच्या राजीव गांधी माहिती आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील ५४ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून कडक  कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे आंध्र प्रदेशच्या राजीव गांधी माहिती आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील ५४ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून कडक  कारवाई करण्यात आली आहे. . गेल्या महिन्यात विद्यापीठात शिकणाऱ्या काही सिनिअर विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांचं रॅगिंग केल्याचा प्रकार घडला होता.सर्व विद्यार्थ्यांवर सोमवारी विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली.

हैदराबाद, दि. 19- आंध्र प्रदेशच्या राजीव गांधी माहिती आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील ५४ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी व्यवस्थापनाकडून कडक  कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात विद्यापीठात शिकणाऱ्या काही सिनिअर विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांचं रॅगिंग केल्याचा प्रकार घडला होता. या सर्व विद्यार्थ्यांवर सोमवारी विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

२९ ऑगस्ट रोजी विद्यापाठीतील सिनिअर विद्यार्थ्यांनी १२ ज्युनिअर विद्यार्थ्यांना एका रूममध्ये नेऊन त्यांना शिक्षा दिली होती. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. काही विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागंल. त्यानंतर पीडित विद्यार्थ्यांनी या सगळ्याविरोधात तक्रार विद्यापीठ व्यवस्थापनाकडे केली होती. या प्रकरणी विद्यापीठाच्या एका समितीकडून चौकशी झाल्यावर 54 विद्यार्थी दोषी आढळले होते. चौकशी समितीने दोषी विद्यार्थांना निलंबित करण्याची सूचना केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने सांगितलं. निलंबित करण्यात आलेले विद्यार्थी विद्यापीठात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षात शिकत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

दोषी विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थांना वर्षभरासाठी वर्गात हजेरी लावता येणार नाही. त्याचबरोबर त्यांना वार्षिक परीक्षाही देता येणार नाही. इतर नऊ विद्यार्थांना एका वर्षासाठी महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलं आहे. पण, त्यांना वार्षिक परीक्षा देता येणार आहे. तसंच इतर १३ विद्यार्थ्यांवर नोव्हेंबरपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर उरलेल्या २४ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आलं असल्याचं विद्यापीठाचे रजिस्ट्रार व्ही. व्यंकट दास यांनी सांगितलं. 

देशात २००९ मध्ये रॅगिंगविरोधी कायदा लागू करण्यात आला होता. त्याचबरोबर रॅगिंगसंबंधी कुठलीही तक्रार आणि मदतीसाठी सरकारने यंत्रणा उभारली होती. तरीही रॅगिंगचे प्रकार थांबले नाहीत.