शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

हमीद अन्सारी

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

शेतकर्‍यांवरील ताण कमी करण्यासाठी शाश्वत कृषि विमा उत्पादने विकसित करा - उपराष्ट्रपती

शेतकर्‍यांवरील ताण कमी करण्यासाठी शाश्वत कृषि विमा उत्पादने विकसित करा - उपराष्ट्रपती
मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे येणार्‍या संकटकाळात शेतकर्‍यांना टिकाव धरता यावा यासाठी शाश्वत कृषि विमा उत्पादने विकसित करावीत,असे आवाहन उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी विमा कंपन्यांना केले. इन्श्युरन्स इन्स्टट्यिूट ऑफ इंडियाच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित समारंभात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकर्‍यांचे संरक्षण करणे आणि पुढील हंगामापर्यंत त्यांचा पतदर्जा कायम राहावा, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि त्याच्या त्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम या समस्यांचे निवारण करणे गरजेचे आहे.
भारतातील कृषि क्षेत्राला दुष्काळ, पूर, पिकाला कीड लागणे आणि पिकांना लागणारे रोग यांचा धोका असतो. पर्जन्यमान मोजमापाच्या अद्ययावत सुविधेच्या मदतीने पर्जन्यमान विमा योजना तयार करून या समस्यांवर काही प्रमाणात मात करता येईल. सार्वजनिक आणि खासगी विमा कंपन्या पर्जन्यमान विमा उत्पादनांसंदर्भातील शक्यता पडताळून पाहत आहेत आणि त्यांच्या प्रतिसाद प्रोत्साहन वाढविणारा आहे, असेही अन्सारी यांनी सांगितले.
विम्याचा प्रसार तळागाळापर्यंत न झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. २०१२-१३ या वर्षासाठी विम्यातून मिळणार्‍या प्रिमीअमचे प्रमाण जीडीपीच्या ३.९६ टक्के एवढे होते. जगभरात हेच प्रमाण सरासरी ६.३ टक्के एवढे होते, असेही त्यांनी नमूद केले.
रवांडा, घाना, सेनेगल इत्यादी आफ्रिकन देशांमध्ये शेतकर्‍यांना पारंपरिक पिकविम्यापेक्षा वातावरणावर आधारित विमा कमी प्रिमीअमध्ये देण्यात येतो. भारतात विम्याचा प्रसार करण्यासाठी या मॉडेलमध्ये भारताच्या दृष्टीने सुधारणा करून ती वापरता येऊ शकतात, असेही अन्सारी म्हणाले.