शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

'सोनिया गांधींनी पाठिंबा दिला नसता, तर तेलंगणाची निर्मिती झाली नसती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 05:29 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य

हैदराबाद : काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाली नसती, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले. तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारासाठी काँग्रेसने विजयाभेरी यात्रेचे आयोजन केले आहे. त्यात सहभागी झालेले राहुल गांधी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत.त्यांनी एका सभेत सांगितले की, तेलंगणासह, राजस्थान, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेस भाजपचा पराभव करणार आहे. काँग्रेसकडून तेलंगणात भारत राष्ट्र समिती पराभूत होईल. भारत राष्ट्र समितीच्या सरकारने या राज्याचा विकास केलेला नाही. तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जितक्या पैशांची लूट केली, तो सारा पैसा आम्ही जनतेला परत देणार आहोत. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस पक्ष संसदेत भाजपला पाठिंबा देतो. या गोष्टी जनतेने नीट समजून घ्याव्यात, असे राहुल गांधी यांनी जगतियाल येथील प्रचारसभेत सांगितले. (वृत्तसंस्था)

ही सरंजामदार विरुद्ध जनता अशी लढाईराहुल गांधी म्हणाले, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे तेलंगणाशी (त्यावेळी हा प्रदेश आंध्र प्रदेश राज्याचा भाग होता) जिव्हाळ्याचे संबंध होेते. तेलंगणातील विधानसभा निवडणूक म्हणजे सरंजामदार विरुद्ध सामान्य जनता अशी लढाई आहे. 

राहुल गांधी यांनी बनविला डोसाविजयाभेरी यात्रेदरम्यान राहुल गांधी जगतियालनजीक एका खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर थांबले. तिथे त्यांनी स्वत: डोसा बनविला आणि साेबतच्या लाेकांना खाऊ घातला. त्यांनी परिसरातील मुलांना चॉकलेटही वाटली, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. 

हळद उत्पादकांना प्रति क्विंटल १२-१५ हजार रुपयेतेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १२ ते  १५ हजार रुपये आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दिले आहे. या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विजयाभेरी यात्रेचे आयोजन केले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीTelanganaतेलंगणा