शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ह्रदयविकार आणि कॅन्सरपेक्षाही जास्त गतीने फैलावतोय 'हा' आजार

By admin | Updated: March 22, 2017 12:39 IST

सेफ्टी अँण्ड सेक्युरिटी फॉर जनरेशन्सने (SAGA) केलेल्या एका सर्व्हेक्षणात ही माहिती समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - आपण अनेकदा घाईघाईत एखाद्या ठिकाणी पोहोचतो आणि नेमकं कशासाठी आलो आहोत, हेच लक्षात येत नाही. असं अनेक जणांसोबत होत असतं. अशावेळी अनेकांना स्वत:चा प्रचंड राग येत असतो, ज्यामुळे तणावही वाढत असतो. पण असं का होतं याचा कधी तुम्ही विचार केला आहे का ? विरसण्याची ही सवय अनेकांमध्ये सामान्य झाली असून एका ठरविक वेळेनंतर ही सवय एका गंभीर आजाराचं रुप घेते. 
 
सेफ्टी अँण्ड सेक्युरिटी फॉर जनरेशन्सने  (SAGA) केलेल्या एका सर्व्हेक्षणात विसरभोळेपणाचा हा आजार ह्रदयविकार आणि कॅन्सरपेक्षाही जलद गतीने फैलावत आहे. 2010 ते 2013 दरम्यान अशा लोकांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर बेरी गॉर्डन यांनी सांगितलं आहे की, 'हा आजार गतीने फैलावत आहे. कामाच्या ठिकाणी असणारा ताण आणि यश मिळवण्यासाठी सुरु असलेली शर्यत हे एक कारण असू शकतं'. 
 
मध्यम वयोगटातील व्यक्तींमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ज्या लोकांवर प्रमाणापेक्षा जास्त कामाचा बोझा असतो त्यांच्यामधे तसंच स्वत:साठी अजबिात वेळ न देणा-यांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसत असल्याचं समोर आलं आहे.
 
'जेव्हा दुसरे लोक तुमच्याकडून प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवतात तेव्हा तुम्ही स्वत:ला विसरु लागता. हा आजार जाणवत असल्यास त्यामधून सुटका करुन घेण्यासाठी सर्वात आधी स्वताकडून प्रमाणपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणं बंद केलं पाहिजे', असं डॉक्टर बेरी यांनी सांगितलं आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट विसरतो तेव्हा स्वत:ला दोषी ठरवू लागतो. पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात असते तेव्हा मात्र आपण स्वत:ला क्रेडिट देत नाही.
 
प्रमाणापेक्षा जास्त माहिती गोळा करताना प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं नाही. त्यामुळे स्वत:ला जागरुक ठेवा मात्र त्याचं ओझं होऊ देऊ नका. कोणीही पुर्पणणे परफेक्ट नसतो हेदेखील लक्षात ठेवा. काही विसरत आहोत असं सारखं वाटत असेल तर आपल्या राहणीमानात थोडा बदल करु पहा.