शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Gyanesh Kumar: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला राहुल गांधींनी केला विरोध, बैठकीत मोदी-शाहांसमोर कोणता मुद्दा मांडला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 07:58 IST

Gyanesh Kumar Rahul Gandhi: ज्ञानेश कुमार यांची केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती तूर्तास न करण्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी उपस्थित केला होता. 

Gyanesh Kumar CEC: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बैठकीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठीच्या तीन सदस्यीय समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड न करण्याची भूमिका मांडली होती. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील या समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या बैठकीत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यासमोर मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती तूर्तास टाळण्याचा मुद्दा मांडला. 

राहुल गांधी बैठकीत काय बोलले?

राहुल गांधी यांनी बैठकीत सांगितले होते की, नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती तोपर्यंत टाळण्यात यावी, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांवरील निकाल येत नाही. निवड समितीमध्ये सरन्यायाधीशांचा समावेश नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आहेत. 

काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, "पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या बैठकीत राहुल गांधींनी नवी निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबद्दल असहमती दर्शवली. त्यांनी सांगितले की, ही निवड समिती स्वातंत्र आणि तटस्थतेला प्रभावित करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात आहे. राहुल गांधींनी एका पत्राद्वारे ही असहमती निवड समितीसमोर ठेवली." 

सरन्यायाधीशांऐवजी मंत्र्याचा समावेश

पूर्वीही मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीमध्ये तीन सदस्यच होते. पण, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश होता. मात्र मोदी सरकाच्या काळात केंद्रीय निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना बाहेर काढण्यात आले आणि एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यात आला. 

काँग्रेसची भूमिका काय? 

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यासमोर मुद्दा मांडला की, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून सरन्यायाधीशांना बाहेर ठेवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात आहेत. त्या याचिकांवर १९ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर निवड समितीची बैठक घेण्यात यावी. प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्यासंदर्भात सरकार सर्वोच्च न्यायालयाला पत्र देऊ शकते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय