शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

गुजरात पाणीप्रश्नी चर्चेचा ठराव आणू सभापतींचे निर्देश : जलसंपदामंत्र्यांची ग्वाही

By admin | Updated: March 21, 2015 00:02 IST

नाशिक : महाराष्ट्र-गुजरात पाण्यासंबंधी विधान परिषदेत प्रस्ताव चर्चेला ठेवून महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्राला राहील असा ठराव आणावा, असे निर्देश विधान परिषद सभापतींनी सरकारला दिले.

नाशिक : महाराष्ट्र-गुजरात पाण्यासंबंधी विधान परिषदेत प्रस्ताव चर्चेला ठेवून महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्राला राहील असा ठराव आणावा, असे निर्देश विधान परिषद सभापतींनी सरकारला दिले. आमदार जयंत जाधव यांनी या संदर्भात लक्षवेधी मांडली, त्यात म्हटले की, दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पातील २० टीएमसी. पाणी मुंबईला देऊन उर्वरित ६३ टीएमसी पाणी गुजरातला दिले जाणार असल्याची माहिती जानेवारीत उघडकीस आली. त्याच बरोबरच नारपार खोर्‍यातील महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रातील ३२ टीएमसी पाणी गुजरात कच्छ सौराष्ट्रामध्ये नेण्याचे गुजरात सरकार व केंद्र सरकारचे नियोजन असल्याचे समजते. सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष व संस्थांकडून नाशिकमध्ये आंदोलने केली गेली असून, दमणगंगा खोर्‍यातील उपलब्ध ८३ टीएमसी पाण्यापैकी १५ टक्के पाणी स्थानिक जनतेला राखीव ठेवून उर्वरित पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने केंद्र सरकारला सादर करावा, अशी लोकप्रतिनिधींची मागणी आहे. नार खोर्‍यातील उपलब्ध ५० टीएमसी पाणी गिरणा खोर्‍यात वळविण्याचीही मागणी आहे. राज्य शासनाकडून महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जात असून, उर्ध्व गोदावरी खोर्‍यातील अतिरिक्त पाणी प्रवाही पद्धतीने मुकणे धरणातून नाशिक व मराठवाड्याला देणे शक्य असूनही शासनाकडून कार्यवाही केली जात नसल्याने शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली. त्यावर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महाराष्ट्राच्या हद्दीतील एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ दिले जाणार नाही त्यासाठी दमणगंगा खोर्‍यातील भुगड, खार्गीहील हे दोन धरणे बांधून ते बोगद्याद्वारे जोडून पिंजाळ धरणात आणले जाईल व त्यातून २० टीएमसी पाणी मुंबईला, तर १० टीएमसी पाणी वैतरणा धरणात व तेथून गोदावरी खोर्‍यात आणण्यात येईल, असे सांगितले. नार प्रकल्पातील २९ टीएमसी समुद्राला वाहून जाणारे पाणी ७०० मीटरपेक्षा अधिक उंचीवरून उचलून आणणे व्यवहार्य नसल्याने ते सरदार सरोवरात टाकले जाईल व स‘ाद्री रांगामधील ११ टीएमसी पाणी गिरणा खोर्‍यात टाकावे आणि या राष्ट्रीय प्रकल्पाचा खर्च केंद्र सरकारने करावा असा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. दमणगंगा तसेच नार-पार खोर्‍यातील पाणी वापराबाबत कोणताच करार झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधकांनी याप्रश्नी सभागृहात चर्चेचा प्रस्ताव आणावा, अशी मागणी केल्यावर या प्रश्नावर चर्चा घडवून ठराव करण्यात येईल, असे निर्देश सभापतींनी दिले.