शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगस्नेही धोरणात गुजरात अग्रेसर !

By admin | Updated: September 15, 2015 05:34 IST

देशातील उद्योगस्नेही राज्यांची क्रमवारी केंद्र सरकारने (डिपार्टमेंट आॅफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन्स-डीआयपीपी) जागतिक बँकेच्या सहयोगाने सादर केली असून

नवी दिल्ली : देशातील उद्योगस्नेही राज्यांची क्रमवारी केंद्र सरकारने (डिपार्टमेंट आॅफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन्स-डीआयपीपी) जागतिक बँकेच्या सहयोगाने सादर केली असून, यामध्ये गुजरात राज्य ७१.१४ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे; तर या यादीत महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे. उद्योगस्नेही अशा १८२ राष्ट्रांच्या यादीत भारत १४२व्या स्थानावर असल्याचेही दिसून आले.भारतात गुंतवणुकीस अनुकूल वातावरण नाही अथवा लालफितीचा कारभार यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास अनेक वर्षे लागतात, अशा प्रचारामुळे गुंतवणुकीला खीळ बसत असल्याची चर्चा कायमच असते. परंतु या अहवालामुळे अनेक अशा चर्चांना विराम मिळाला असून, गुंतवणुकीची व विविध राज्यांच्या उद्योगस्नेही धोरणांची राज्यनिहाय स्थिती उपलब्ध झाली आहे. या अहवालानुसार आंध्र प्रदेश (७०.१२ टक्के) दुसऱ्या स्थानावर, झारखंड (६३.०९ टक्के) तिसऱ्या स्थानावर, छत्तीसगड (६२.४५ टक्के) आणि मध्य प्रदेश (६२ टक्के) पाचव्या स्थानावर आहे. उद्योगस्नेही धोरण आहे अथवा कसे, यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले होते. यामध्ये उद्योगाची स्थापना करणे, जमीन उपलब्ध करून देणे, कामगार कायद्यातील नियमन, पायाभूत सुविधांची उपलब्धी, नोंदणी प्रक्रिया, कर प्रक्रिया, कंत्राट पद्धती अशा विविध घटकांचा समावेश होता. या निकषांच्या आधारे राज्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. एखाद्या उद्योगाच्या दृष्टीने गुंतवणुकीपासून ते व्यवसायाची प्रत्यक्ष सुरुवात यामध्ये विविध प्रकारचे कर हा कायमच कळीचा मुद्दा असतो; परंतु अनेक राज्यांतून करांचे सुसूत्रीकरण, सुलभीकरण झाल्याचे दिसून आले आहे. आॅनलाइन कर संकलनात देश अग्रेसरराज्य सरकारांच्या अखत्यारीतील कर संकलनात आता आॅनलाइन प्रणाली चांगलीच रुजली आहे. देशातील २९ राज्यांतून व्हॅटचा भरणा आॅनलाइन होतो, तर २८ राज्यांतून सीएसटी आॅनलाइन भरला जातो. व्हॅटच्या ई-फायलिंगची सुविधा ३० राज्यांतून उपलब्ध आहे, तर २७ राज्यांतून सीएसटीचे ई-फायलिंग होते.२९ राज्यांतून मोठी सुधारणा झालीउद्योगांना जमीन उपलब्ध करून देणे आणि बांधकामाशी संबंधित विविध परवानग्या हा राज्य सरकारांच्या दृष्टीने जटिल आणि संवेदनशील मुद्दा असतो. परंतु या दोन्ही घटकांतही २९ राज्यांतून मोठी सुधारणा झाली असल्याचे या पाहणीदरम्यान दिसून आले आहे. सुमारे १८ राज्यांतून एक खिडकी योजना प्रभावीपणे राबविली जात असून, १६ राज्यांत एखाद्या प्रकल्पपूर्तीस किती वेळ लागेल याचा नेमका आराखडा दिला जातो.राज्यांची क्रमवारीगुजरात (७१.१४ टक्के), आंध्र प्रदेश (७०.१२ टक्के) दुसऱ्या स्थानावर, झारखंड (६३.०९ टक्के) तिसऱ्या स्थानावर, छत्तीसगड (६२.४५ टक्के) आणि मध्य प्रदेश (६२ टक्के) पाचव्या स्थानावर आहे.