शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

याचिका फेटाळली; गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसच्या हातून जाणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 16:06 IST

केंद्रीय मंत्री अमित शाह गांधीनगर मतदार संघातून आणि स्मृती इराणी अमेठी लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्यामुळे राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर एकत्र निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते परेशभाई धनानी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती.

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने राज्यसभा निवडणुकीसंदर्भातील गुजरातकाँग्रेसची याचिका फेटाळली. या संदर्भातील याचिका निवडणूक आयोगासमोर सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्ते गुजरात प्रदेश काँग्रेसचे वकील विवेक तंखा यांना केल्या. तसेच निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतरच आम्ही निवडणूक याचिकेप्रमाणे सुनावाई करू, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, रेग्युलर रिक्त जागा भरण्यासाठी सोबत निवडणूक होते. परंतु, अकस्मिक रिक्त झालेल्या जागांवर सोबत निवडणूक घ्यावी, अशी काही प्रतिबद्धता नाही. विविध विषयांवर न्यायालयाच्या आदेशांमुळे आता तिसरी स्टेट्युटरी श्रेणी समोर आली आहे. त्यामुळे ही याचिका तुम्ही निवडणूक आयोगात दाखल करा, असंही न्यायालयाने म्हटले आहे.

भाजपच्या विजयाची शक्यता वाढली

न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप राज्यसभेच्या दोन्ही जागांवर विजय मिळवणार अशी स्थिती आहे. संख्याबळानुसार गुजरातेत राज्यसभेवर जाण्यासाठी उमेदवाराला ६१ मतांची गरज आहे. निवडणूक आयोगाच्या नोटिफिकेशननुसार आमदार दोन वेळा मतदान करणार आहे. भाजपकडे गुजरातेत १०० हून अधिक आमदार असून या आमदारांनी दोनवेळा मतदान केल्यास भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी होऊ शकतात.

केंद्रीय मंत्री अमित शाह गांधीनगर मतदार संघातून आणि स्मृती इराणी अमेठी लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्यामुळे राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर एकत्र निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते परेशभाई धनानी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली.

...तर काँग्रेसला एक जागा मिळाली असती

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०० आमदार असून काँग्रेसचे ७१ आमदार आहेत. तर सात जागा रिक्त आहेत. अशात रिक्त झालेल्या दोन्ही जागांवर एकत्र मतदार झाल्यास, आमदारांना केवळ एकदाच मतदान करता येणार आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एक जागा जिंकू शकते. म्हणून काँग्रेसला दोन्ही जागांसाठी एकत्र निवडणूक हवी आहे.