शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात सरकारने दिला वृत्तपत्रांना आश्वासक पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:54 IST

आयएनएसनकडून मुख्यमंत्री रूपानी यांच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता

नवी दिल्ली : वृत्तपत्रे अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत असताना गुजरात सरकारच्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल इंडियन न्यूज पेपर सोसायटीने (आयएनएस) कृतज्ञता व्यक्त करून त्यांची प्रशंसा केली आहे. आयएनएसचे अध्यक्ष शैलेश गुप्ता यांनी सोसायटीच्या सदस्यांच्या वतीने निवेदनाद्वारे ही कृतज्ञता व्यक्त केली.

विजय रूपानी यांनी वृत्तपत्रे ही खऱ्या, अचूक आणि विश्वासार्ह माहितीचा सर्वात मोठा स्रोत असल्याचे नमूद करून लोकांना खºया बातम्या देऊन ते त्यांना खोट्या बातम्यांपासून दूर ठेवतात. हीच आजची गरज आहे, असे म्हटले. एप्रिल २०२० पर्यंत प्रसिद्ध झालेल्या सरकारी जाहिरातींची थकलेली सगळी बिले अदा करून या अत्यंत गरजेच्या वेळी सरकार वृत्तपत्रांना पाठिंबा देईल, असे आश्वासन रूपानी यांनी दिले. सरकारचे हे आश्वासन स्वागतार्ह असून, त्यातून वृत्तपत्र उद्योगाला खूप आवश्यक असलेला दिलासा मिळेल. कारण गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यात या उद्योगाचे जवळपास ४,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे गुप्ता यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडूनही आम्हाला अशाच पाठिंब्याची गरज आहे कारण गेल्या काही आठवड्यांत आयएनएसने केंद्र सरकारला प्रोत्साहन पॅकेजची विनंती केली होती व एप्रिल २०२० पर्यंत प्रसिद्ध वृत्तपत्रांत, जाहिरात संस्थांकडे प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींची थकलेली बिले अदा केली जावीत यासाठी सगळी राज्य सरकारे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग तसेच केंद्र सरकारने ताबडतोब पावले उचलावीत म्हणून त्यांचा पाठिंबा मागितला होता. यामुळे वृत्तपत्र उद्योगासमोरील संकटाला व अडचणींना तोंड देण्यासाठी बळ मिळेल, असे आयएनएसने म्हटले.तीस लाख लोकांना रोजगारवृत्तपत्रे ही आतापर्यंत कधी नव्हत्या अशा अडचणी आणि प्रक्षुब्ध दिवसांना तोंड देत आहेत. या उद्योगातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ३० लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. तथापि, अनेक अडचणींना तोंड देत व वाढता खर्च असताना व परतावा काही नसतानाही वृत्तपत्र हे प्रत्येक सकाळी देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यांत पोहोचले पाहिजे यासाठी आवश्यक ती पावले उचलली गेलेली आहेत, असे शैलेश गुप्ता यांनी त्यात म्हटले आहे.

टॅग्स :Gujaratगुजरातcorona virusकोरोना वायरस बातम्या