शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

अरविंद केजरीवाल, संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ! गुजरात कोर्टाने पाठवले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 10:02 IST

गुजरात हाय कोर्टाने केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश रद्द केल्यानंतरही दोन्ही आप नेत्यांनी बदनामीकारक विधाने केली, असा आरोप फौजदारी तक्रारीत रजिस्ट्रार पीयूष पटेल यांनी केला आहे.

अहमदाबाद : अहमदाबाद येथील मॅजिस्ट्रेट कोर्टाने शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे (AAP)  राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना फौजदारी मानहानीच्या तक्रारीत समन्स बजावले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पदवी प्रकरणाबाबत केलेल्या वक्तव्यावर कोर्टाने प्रथमदर्शनी या दोन नेत्यांच्या टिप्पण्यांमध्ये मानहानीचे प्रकरण योग्य असल्याचे आढळले. यानंतर दोन्ही नेत्यांना 23 मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. 

गुजरात विद्यापीठाचे रजिस्ट्रार पीयूष पटेल यांनी दाखल केलेल्या मानहानीचा फौजदारी तपास निकाली काढल्यानंतर अतिरिक्त मॅजिस्ट्रेट जयेशभाई लिंबाभाई पटेल यांच्या कोर्टाने आप नेत्यांविरुद्ध हा फौजदारी खटला सुरू केला आहे.

या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून नाही तर 'व्यक्तिगत क्षमतेनुसार आरोपी' मानले जाईल, असे सांगण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांची अशी काही विधाने आहेत, ज्यावर पटेल यांनी मानहानीकारक असल्याचा आरोप केला आहे. 

संजय सिंह यांच्या प्रकरणातही पटेल यांनी त्यांच्या वक्तव्यामुळे बदनामीचा आरोप केला आहे. अशा विधानांचा उद्देश विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचविण्याचा आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यांनाही माहीत असताना अशी विधाने बदनामीकारक केली आहेत. 

गुजरात हाय कोर्टाने केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश रद्द केल्यानंतरही दोन्ही आप नेत्यांनी बदनामीकारक विधाने केली, असा आरोप फौजदारी तक्रारीत रजिस्ट्रार पीयूष पटेल यांनी केला आहे.

केंद्रीय माहिती आयोगाने विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवींबाबत 'माहिती शोधण्याचे' निर्देश दिले होते. तसेच, गुजरात उच्च न्यायालयाने 31 मार्च रोजी दिलेल्या आदेशात अरविंद केजरीवाल यांना 25,000 रुपयांचा दंडही ठोठावला होता. 

पटेल यांच्या म्हणण्यानुसार, केजरीवाल यांनी 1 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत आणि 2 एप्रिल रोजी संजय सिंह यांनी दुसर्‍या पत्रकार परिषदेत 'अपमानजनक विधाने' केली. ते पुढे म्हटले आहे की, 'राजकीय व्यक्ती आपल्या लोकांची सेवा करण्याऐवजी एकमेकांविरुद्ध शत्रुत्व वाढवतात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रतिस्पर्ध्याला वैयक्तिकरित्या हानी पोहोचवण्याचे आणि लोकांच्या विश्वासाला तडा देण्याचे काम करतात.'

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालGujaratगुजरातCourtन्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदी