शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

अरविंद केजरीवाल, संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ! गुजरात कोर्टाने पाठवले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 10:02 IST

गुजरात हाय कोर्टाने केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश रद्द केल्यानंतरही दोन्ही आप नेत्यांनी बदनामीकारक विधाने केली, असा आरोप फौजदारी तक्रारीत रजिस्ट्रार पीयूष पटेल यांनी केला आहे.

अहमदाबाद : अहमदाबाद येथील मॅजिस्ट्रेट कोर्टाने शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे (AAP)  राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना फौजदारी मानहानीच्या तक्रारीत समन्स बजावले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पदवी प्रकरणाबाबत केलेल्या वक्तव्यावर कोर्टाने प्रथमदर्शनी या दोन नेत्यांच्या टिप्पण्यांमध्ये मानहानीचे प्रकरण योग्य असल्याचे आढळले. यानंतर दोन्ही नेत्यांना 23 मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. 

गुजरात विद्यापीठाचे रजिस्ट्रार पीयूष पटेल यांनी दाखल केलेल्या मानहानीचा फौजदारी तपास निकाली काढल्यानंतर अतिरिक्त मॅजिस्ट्रेट जयेशभाई लिंबाभाई पटेल यांच्या कोर्टाने आप नेत्यांविरुद्ध हा फौजदारी खटला सुरू केला आहे.

या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून नाही तर 'व्यक्तिगत क्षमतेनुसार आरोपी' मानले जाईल, असे सांगण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांची अशी काही विधाने आहेत, ज्यावर पटेल यांनी मानहानीकारक असल्याचा आरोप केला आहे. 

संजय सिंह यांच्या प्रकरणातही पटेल यांनी त्यांच्या वक्तव्यामुळे बदनामीचा आरोप केला आहे. अशा विधानांचा उद्देश विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचविण्याचा आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यांनाही माहीत असताना अशी विधाने बदनामीकारक केली आहेत. 

गुजरात हाय कोर्टाने केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश रद्द केल्यानंतरही दोन्ही आप नेत्यांनी बदनामीकारक विधाने केली, असा आरोप फौजदारी तक्रारीत रजिस्ट्रार पीयूष पटेल यांनी केला आहे.

केंद्रीय माहिती आयोगाने विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवींबाबत 'माहिती शोधण्याचे' निर्देश दिले होते. तसेच, गुजरात उच्च न्यायालयाने 31 मार्च रोजी दिलेल्या आदेशात अरविंद केजरीवाल यांना 25,000 रुपयांचा दंडही ठोठावला होता. 

पटेल यांच्या म्हणण्यानुसार, केजरीवाल यांनी 1 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत आणि 2 एप्रिल रोजी संजय सिंह यांनी दुसर्‍या पत्रकार परिषदेत 'अपमानजनक विधाने' केली. ते पुढे म्हटले आहे की, 'राजकीय व्यक्ती आपल्या लोकांची सेवा करण्याऐवजी एकमेकांविरुद्ध शत्रुत्व वाढवतात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रतिस्पर्ध्याला वैयक्तिकरित्या हानी पोहोचवण्याचे आणि लोकांच्या विश्वासाला तडा देण्याचे काम करतात.'

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालGujaratगुजरातCourtन्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदी