शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

काँग्रेस माजी नेत्याच्या मुलाचं लग्न भोवलं, लग्नातील जेवणानं १ हजाराहून अधिक जण आजारी; FDCA नं जमा केले सॅम्पल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 10:54 IST

गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यातील एका लग्न सोहळ्यातील जेवणातून एक हजाराहून अधिक जण आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. आजारी पडलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यातील एका लग्न सोहळ्यातील जेवणातून एक हजाराहून अधिक जण आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. आजारी पडलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून तपास अहवालानुसार कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. विसगर तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी बीएमल मेहरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे माजी नेते वजीर खान पठाण यांच्या मुलाचा विवाह सोहळा ३ मार्च रोजी पार पडला. त्यांनी ४ मार्च रोजी रिसेप्शन ठेवलं होतं. या रिसेप्शनला तब्बल १२ ते १४ जणार जणांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यातील १ हजार ५७ जण आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आजारी पडलेल्यांना गांधीनगरच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पार्थजयसिंह गोहिल म्हणाले की, रुग्णालय प्रशासन यांच्या सूचनेनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. रिसेप्शनमध्ये देण्यात आलेल्या मिठाई आणि जेवणातील काही पदार्थांचे सॅम्पल एफएसएल व एफडीसीएच्या पथकानं जमा केले आहेत. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर त्यानुसार कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणाची आरोग्य विभागाकडूनही चौकशी करण्यात येत आहे. आजारी पडलेल्यांच्या उलटी आणि शौचाचे सॅम्पल जमा करण्यात आले आहेत. प्रथमदर्शनी रिसेप्शन सोहळ्यातील कॅटररच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. पण त्यासोबतच जेवणातील भेसळीचंही हे प्रकरण असू शकतं अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :Gujaratगुजरात