शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दोषींची गय करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 04:43 IST

गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील मृत्यू आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे नव्हे, तर इन्सेफ्लाइटिसमुळे (मेंदूज्वर) झाले आहेत.

गोरखपूर : गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील मृत्यू आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे नव्हे, तर इन्सेफ्लाइटिसमुळे (मेंदूज्वर) झाले आहेत. तरीही चौकशीत दोषी आढळणाºयांची गय करणार नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी स्पष्ट केले.मेडिकल कॉलेजमधील ६३ बालमृत्यूनंतर केेंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी हॉस्पिटलला भेट दिली. येथे दाखल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची त्यांनी विचारपूस केली. इन्सेफ्लाइटिसविरुद्ध लढाईचा उल्लेख करताना आदित्यनाथ यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. भावनिक होत ते म्हणाले की, या मुद्यावर माझ्यापेक्षा संंवेदनशिल कोण असू शकतो? मी या मुद्यावर संसदेपासून ते रस्त्यापर्यंत संघर्ष केलेला आहे. या रोगाची व्यथा माझ्यापेक्षा दुसरे कोण समजू शकते. राज्यातील ३५ जिल्ह्यात ९० लाखांपेक्षा अधिक बालकांच्या लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे.आदित्यनाथ म्हणाले की, राज्याचे मुख्य सचिव आणि केंद्रीय सचिव या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करतील. दिल्लीतील उच्चस्तरीय पथकही याचा तपास करत आहे. या घटनेमुळे पंतप्रधान मोदी अतिशय काळजीत आहेत. राज्य सरकारला सर्वोतोपरी मदत दिली जात आहे. दिल्लीतील डॉक्टरांचे एक पथक येथे दाखल झाले आहे.व्हायरस रिसर्च सेंटरची स्थापनामेंदूज्वराच्या उपचारासाठी ‘रिजनल व्हायरस रिसर्च सेंटर’ स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी येथे केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, यासाठी केंद्र सरकार ८५ कोटी रुपये देणार आहे.डॉ. पी. के. सिंग नवे प्राचार्यबाबा राघव दास मेडिकल कॉलेजचे प्राचार्य आर. के. मिश्रा यांना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी आता डॉ. पी. के. सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.१७ बालकांचा मृत्यूबारसे होण्याआधीचतीन आठवड्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने रडून रडून त्यांच्या डोळ्यातील पाणी आटले आहे. मुलाचा फोटो छातीला धरुन ते निर्विकार नजरेने पाहतात तेव्हा सांत्वनासाठी शब्दही उरत नाहीत. बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमधील त्या बालमृत्यूतील पालकांची अवस्था घटनेतील भीषणता अधोरेखित करते. लक्ष्मी आणि शैलेंदर यांनी आपला मुलगा यात गमावला आहे.