शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

दोषींची गय करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 04:43 IST

गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील मृत्यू आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे नव्हे, तर इन्सेफ्लाइटिसमुळे (मेंदूज्वर) झाले आहेत.

गोरखपूर : गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील मृत्यू आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे नव्हे, तर इन्सेफ्लाइटिसमुळे (मेंदूज्वर) झाले आहेत. तरीही चौकशीत दोषी आढळणाºयांची गय करणार नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी स्पष्ट केले.मेडिकल कॉलेजमधील ६३ बालमृत्यूनंतर केेंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी हॉस्पिटलला भेट दिली. येथे दाखल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची त्यांनी विचारपूस केली. इन्सेफ्लाइटिसविरुद्ध लढाईचा उल्लेख करताना आदित्यनाथ यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. भावनिक होत ते म्हणाले की, या मुद्यावर माझ्यापेक्षा संंवेदनशिल कोण असू शकतो? मी या मुद्यावर संसदेपासून ते रस्त्यापर्यंत संघर्ष केलेला आहे. या रोगाची व्यथा माझ्यापेक्षा दुसरे कोण समजू शकते. राज्यातील ३५ जिल्ह्यात ९० लाखांपेक्षा अधिक बालकांच्या लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे.आदित्यनाथ म्हणाले की, राज्याचे मुख्य सचिव आणि केंद्रीय सचिव या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करतील. दिल्लीतील उच्चस्तरीय पथकही याचा तपास करत आहे. या घटनेमुळे पंतप्रधान मोदी अतिशय काळजीत आहेत. राज्य सरकारला सर्वोतोपरी मदत दिली जात आहे. दिल्लीतील डॉक्टरांचे एक पथक येथे दाखल झाले आहे.व्हायरस रिसर्च सेंटरची स्थापनामेंदूज्वराच्या उपचारासाठी ‘रिजनल व्हायरस रिसर्च सेंटर’ स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी येथे केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, यासाठी केंद्र सरकार ८५ कोटी रुपये देणार आहे.डॉ. पी. के. सिंग नवे प्राचार्यबाबा राघव दास मेडिकल कॉलेजचे प्राचार्य आर. के. मिश्रा यांना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी आता डॉ. पी. के. सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.१७ बालकांचा मृत्यूबारसे होण्याआधीचतीन आठवड्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने रडून रडून त्यांच्या डोळ्यातील पाणी आटले आहे. मुलाचा फोटो छातीला धरुन ते निर्विकार नजरेने पाहतात तेव्हा सांत्वनासाठी शब्दही उरत नाहीत. बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमधील त्या बालमृत्यूतील पालकांची अवस्था घटनेतील भीषणता अधोरेखित करते. लक्ष्मी आणि शैलेंदर यांनी आपला मुलगा यात गमावला आहे.