शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

दोषींची गय करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 04:43 IST

गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील मृत्यू आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे नव्हे, तर इन्सेफ्लाइटिसमुळे (मेंदूज्वर) झाले आहेत.

गोरखपूर : गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील मृत्यू आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे नव्हे, तर इन्सेफ्लाइटिसमुळे (मेंदूज्वर) झाले आहेत. तरीही चौकशीत दोषी आढळणाºयांची गय करणार नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी स्पष्ट केले.मेडिकल कॉलेजमधील ६३ बालमृत्यूनंतर केेंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी हॉस्पिटलला भेट दिली. येथे दाखल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची त्यांनी विचारपूस केली. इन्सेफ्लाइटिसविरुद्ध लढाईचा उल्लेख करताना आदित्यनाथ यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. भावनिक होत ते म्हणाले की, या मुद्यावर माझ्यापेक्षा संंवेदनशिल कोण असू शकतो? मी या मुद्यावर संसदेपासून ते रस्त्यापर्यंत संघर्ष केलेला आहे. या रोगाची व्यथा माझ्यापेक्षा दुसरे कोण समजू शकते. राज्यातील ३५ जिल्ह्यात ९० लाखांपेक्षा अधिक बालकांच्या लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे.आदित्यनाथ म्हणाले की, राज्याचे मुख्य सचिव आणि केंद्रीय सचिव या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करतील. दिल्लीतील उच्चस्तरीय पथकही याचा तपास करत आहे. या घटनेमुळे पंतप्रधान मोदी अतिशय काळजीत आहेत. राज्य सरकारला सर्वोतोपरी मदत दिली जात आहे. दिल्लीतील डॉक्टरांचे एक पथक येथे दाखल झाले आहे.व्हायरस रिसर्च सेंटरची स्थापनामेंदूज्वराच्या उपचारासाठी ‘रिजनल व्हायरस रिसर्च सेंटर’ स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी येथे केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, यासाठी केंद्र सरकार ८५ कोटी रुपये देणार आहे.डॉ. पी. के. सिंग नवे प्राचार्यबाबा राघव दास मेडिकल कॉलेजचे प्राचार्य आर. के. मिश्रा यांना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी आता डॉ. पी. के. सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.१७ बालकांचा मृत्यूबारसे होण्याआधीचतीन आठवड्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने रडून रडून त्यांच्या डोळ्यातील पाणी आटले आहे. मुलाचा फोटो छातीला धरुन ते निर्विकार नजरेने पाहतात तेव्हा सांत्वनासाठी शब्दही उरत नाहीत. बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमधील त्या बालमृत्यूतील पालकांची अवस्था घटनेतील भीषणता अधोरेखित करते. लक्ष्मी आणि शैलेंदर यांनी आपला मुलगा यात गमावला आहे.