शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

गोवंश रक्षा मंडळाने स्वीकारले शिरापूर छावणीचे पालकत्व बिपीनभाई पटेल यांची माहिती : सुलोचनार्शी साध्वीजी यांच्या प्रेरणेतून संकल्पनेला चालना

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

सोलापूर :

सोलापूर :
मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे अनिल पाटील व बापूराव ताकमोगे या दोन शेतकर्‍यांनी बिकट परिस्थितीत सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्यांचे पालकत्व गोवंश रक्षा मंडळाने स्वीकारले आहे. जैन श्वेतांबर आदेश्वर भगवान मंदिरात चातुर्मास करत असलेल्या सुलोचनार्शी साध्वीजी यांच्या प्रेरणेने पालकत्व स्वीकारण्याच्या संकल्पनेस चालना मिळाल्याची माहिती बिपीनभाई पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावातील अनिल पाटील व बापूराव ताकमोगे या दोन सामान्य शेतकर्‍यांनी एकत्र येऊन जनावरांसाठी छावणी सुरू केली. पाटील यांची आर्थिक परिस्थिती गंभीर असतानाही पत्नीचे मांगल्याचे प्रतीक गहाण ठेवून पैसे उभे केले. माळरानावर बोअर मारून पाणी सुरू केले. मिळेल तो चारा उपलब्ध करून दि.26 जुलै रोजी छावणी सुरू झाली. याची बातमी वर्तमानपत्रातून आल्यानंतर प्राणीमित्र विलास शहा, शीतल शहा, महेश भंडारी यांनी 22 हजार रूपये देऊन मंगळसूत्र सोडविले. छावणीचे पालकत्व घेण्याचाही मानस व्यक्त केला.
यासाठी दि.15 ऑगस्ट रोजी शिवस्मारक येथे बैठक घेऊन केशव रांभिया, जयनारायणजी भुतडा, गौतमचंद वेद, तिलोकचंद वेद, महेश भंडारी यांनी प्रत्यक्ष छावणी स्थळाला भेट देऊन माहिती घेतली. कत्तलखान्याकडे चाललेले पशुधन आणि त्यावर अवलंबून असलेले शेतकरी बांधव यांचे परिवार उद्ध्वस्त होत आहेत. पर्यायाने एकूण अर्थव्यवस्था कोलमडून चालली आहे. अशाच एका भीषणप्रसंगी 2004 साली गोवंश रक्षा मंडळाची तात्पुरती स्थापना होऊन नेहरू नगर, विजापूर रोड येथे विनाअनुदानित तत्त्वावर चारा छावणी सुरू करण्यात आली होती. यंदाही शेतकर्‍यांची स्थिती ओळखून तात्पुरत्या स्वरूपात गोवंश रक्षा मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या वतीने शिरापूर (मोहोळ) येथील छावणीचे पालकत्व दि.26 ऑगस्टपासून स्वीकारण्यात आले आहे, असे बिपीनभाई पटेल यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस केशवजी रांभिया, गौतम वेद, तिलोकचंद वेद, विजयभाई पटेल, महेश भंडारी, जयनारायण भुतडा, रणजित शहा, अनिल पाटील, बाबुराव ताकमोगे, चेतन संघवी, हर्षल कोठारी, सुभाषचंद्र लोणावत उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चौकट..
तन मन धनाने सहकार्य करा..
भारत हा कृषिप्रधान देश आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेती, पशुधन व ग्रामीण व्यवस्थेवर अवलंबून आहे. ही संपूर्ण व्यवस्थाच निसर्गाच्या कृपादृष्टीवर अवलंबून आहे. त्यामुळे समाजबांधव, उद्योजक, व्यापारी मित्रांना आवाहन करण्यात येते की, या विनाअनुदानित तत्त्वावर चालणार्‍या बिगर सरकारी छावणीस यथाशक्ती तन मन धनाने सहकार्य करावे. इच्छुकांनी 9422458087 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी बिपीनभाई पटेल यांनी केले.