शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

जीएसटी विधेयक मंजूर होणारच

By admin | Updated: November 5, 2015 00:29 IST

केंद्र आणि राज्य पातळीवरील विविध अप्रत्यक्ष करांचे स्थान घेणारा प्रस्तावित वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू करणे हा आता केवळ वेळेचा प्रश्न आहे. कारण संसदीय मतदानासमोर

नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य पातळीवरील विविध अप्रत्यक्ष करांचे स्थान घेणारा प्रस्तावित वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू करणे हा आता केवळ वेळेचा प्रश्न आहे. कारण संसदीय मतदानासमोर आर्थिक सुधारणांच्या मार्गातील अडथळे फार काळ टिकणार नाहीत, असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.जीएसटी मुद्यावर संसदेत निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी आपण काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्यास तयार आहोत, असे जेटली यांनी सांगितले. नवी दिल्लीत जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईएफ) आणि सीआयआयच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या संमेलनात जेटली बोलत होते. ते म्हणाले, ‘जीएसटी आता केवळ वेळेचा प्रश्न राहिलेला आहे. कार त्यावर अनिश्चित काळपर्यंत बाधा कायम राहू शकत नाही. जीएसटी जेव्हा केव्हा मतदानासाठी ठेवण्यात येईल तेव्हा त्याला मंजुरी मिळेल, असा माझा विश्वास आहे.’जीएसटीमध्ये एक डझनपेक्षा जास्त राज्यस्तरीय कर समाविष्ट होतील आणि त्यामुळे संपूर्ण देशाला एक सामायिक बाजारपेठ बनण्यास मदत मिळेल. जीएसटी १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु जीएसटी विधेयक राज्यसभेत प्रलंबित असल्याने कोंडी निर्माण झाली आहे. हे विधेयक पारित झाले नाही तर जीएसटी लागू होणे कठीण आहे. गेल्या संसद अधिवेशनात सतत गदारोळ झाल्याने हे विधेयक पारित होऊ शकले नाही.काँग्रेसने जीएसटी विधेयकाला विरोध केल्याबद्दल जेटली यांनी खेद व्यक्त केला. आपण या मुद्यावर काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्यास तयार आहोत, असे ते म्हणाले. येत्या फेब्रुवारीत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कॉर्पोरेट टॅक्समध्ये पहिली कपात करण्यात येईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, कॉर्पोरेट टॅक्स २५ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट आहे. ते टप्प्या-टप्प्याने गाठले जाईल. या करात सध्या देण्यात येत असलेल्या सर्व सवलतीही काढून घेण्यात येतील.पंतप्रधानांनी भांडखोर प्रवृत्ती सोडावी-काँग्रेसजीएसटी विधेयकावर काँग्रेस नेत्यांशी चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले असताना काँग्रेसने मात्र आपली ताठर भूमिका कायम ठेवली आहे. केवळ एका विधेयकासाठी संसदीय लोकशाही कमी केली जाऊ शकत नाही आणि पंतप्रधानांनी अगोदर आपल्या ‘भांडखोर प्रवृत्ती’चा त्याग केला पाहिजे, असे काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.केवळ एका विधेयकासाठी संसदीय लोकशाहीला कमी करता येऊ शकत नाही. पंतप्रधान आणि त्यांचे सरकार घमंडी आणि भांडखोर मनोवृत्तीचे आहे. त्यांनी विरोधकांकडे सकारात्मक सहकार्य मागून आपल्या भांडखोर मनोवृत्तीचा त्याग केला पाहिजे, असे शर्मा म्हणाले.