शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

एकाधिकारशाहीकडे वाढता कल देशासाठी घातक ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:48 IST

लोकशाहीसाठी आवश्यक असलेला संयम सोडून आपण वाढत्या एकाधिकारशाही पर्यायाकडे झुकत आहोत का, असे विचारण्याची सध्या वेळ आली आहे, असे मार्मिक प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी येथे केले.

चंदीगढ : लोकशाहीसाठी आवश्यक असलेला संयम सोडून आपण वाढत्या एकाधिकारशाही पर्यायाकडे झुकत आहोत का, असे विचारण्याची सध्या वेळ आली आहे, असे मार्मिक प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी येथे केले.पूर्वी जेथे अध्यापन केले त्या पंजाब विद्यापीठात ५२ वर्षांनी परत आलेले डॉ. मनमोहन सिंग विद्यार्थी आणि अध्यापकांसमोर एस. बी. रांगणेकर स्मृती व्याख्यान देताना बोलत होते. ते म्हणाले की, नजीकच्या काळ्यात या पर्यायांचे आपल्याला कदाचित चांगले परिणाम दिसतीलही. परंतु दीर्घकाळात अशी एकाधिकारशाही व्यवस्था देशाचा आणि स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांतील सर्व उपलब्धींचा विनाश करेल.ते म्हणाले की, शासन करणे ही गुंतागुंतीची, किचकट बाब आहे. ती संथगतीने चालते. त्यासाठी संयम लागतो व त्यापासून मिळणारे फायदे दीर्घकालीन असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे लोकशाही शासनव्यवस्थेत वंचितांचा आवाज निर्णायक ठरत असतो. हा आवाजच बंद झाला तर लोकशाहीच संपुष्टात येईल.माजी पंतप्रधान म्हणाले की, भारतीय राजकारणात सध्या स्वातंत्र्य हवे की विकास असा एक पूर्णपणे चुकीचा व घातक पर्याय पुढे रेटण्यात येत आहे. पण हा दोन्हींपैकी एकाची निवड शक्य नाही कारण हे दोन्ही परस्परांना पर्याय नाहीत. डॉ. मनोमहन सिंग म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा धोका फार पूर्वीच ओळखला होता. कदाचित भविष्यात लोकांनी लोकांसाठी चालविलेल्या सरकारऐवजी लोकांसाठी चालविले जाणारे सरकार जनता पसंत करेल, अशी चिंता आंबेडकरांनी अचूकपणे व्यक्त केली होती. परंतु स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षात या भ्रामक पर्यायाच्या सापळ््यात न अडकण्यासाठी आपण सावध राहायला हवे. (वृत्तसंस्था)>वाढते अत्याचार अस्वीकार्यडॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, भारतीय समाजात सध्या धर्म, जात, भाषा व संस्कृतीच्या आधारे फूट पाडण्याचे केले जात असलेले प्रयत्न चिंताजनक आहेत. अल्पसंख्यक आणि दलितांवरील अत्याचारही वाढत आहेत. अशा फुटपाडू धोरणांचा व राजकारणाचा नागरिक म्हणून आपण एकदिलाने विरोध करायला हवा. कारण हे थांबविले नाही, तर ते लोकशाहीला मारक ठरेल.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंग