शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

एकाधिकारशाहीकडे वाढता कल देशासाठी घातक ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:48 IST

लोकशाहीसाठी आवश्यक असलेला संयम सोडून आपण वाढत्या एकाधिकारशाही पर्यायाकडे झुकत आहोत का, असे विचारण्याची सध्या वेळ आली आहे, असे मार्मिक प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी येथे केले.

चंदीगढ : लोकशाहीसाठी आवश्यक असलेला संयम सोडून आपण वाढत्या एकाधिकारशाही पर्यायाकडे झुकत आहोत का, असे विचारण्याची सध्या वेळ आली आहे, असे मार्मिक प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी येथे केले.पूर्वी जेथे अध्यापन केले त्या पंजाब विद्यापीठात ५२ वर्षांनी परत आलेले डॉ. मनमोहन सिंग विद्यार्थी आणि अध्यापकांसमोर एस. बी. रांगणेकर स्मृती व्याख्यान देताना बोलत होते. ते म्हणाले की, नजीकच्या काळ्यात या पर्यायांचे आपल्याला कदाचित चांगले परिणाम दिसतीलही. परंतु दीर्घकाळात अशी एकाधिकारशाही व्यवस्था देशाचा आणि स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांतील सर्व उपलब्धींचा विनाश करेल.ते म्हणाले की, शासन करणे ही गुंतागुंतीची, किचकट बाब आहे. ती संथगतीने चालते. त्यासाठी संयम लागतो व त्यापासून मिळणारे फायदे दीर्घकालीन असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे लोकशाही शासनव्यवस्थेत वंचितांचा आवाज निर्णायक ठरत असतो. हा आवाजच बंद झाला तर लोकशाहीच संपुष्टात येईल.माजी पंतप्रधान म्हणाले की, भारतीय राजकारणात सध्या स्वातंत्र्य हवे की विकास असा एक पूर्णपणे चुकीचा व घातक पर्याय पुढे रेटण्यात येत आहे. पण हा दोन्हींपैकी एकाची निवड शक्य नाही कारण हे दोन्ही परस्परांना पर्याय नाहीत. डॉ. मनोमहन सिंग म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा धोका फार पूर्वीच ओळखला होता. कदाचित भविष्यात लोकांनी लोकांसाठी चालविलेल्या सरकारऐवजी लोकांसाठी चालविले जाणारे सरकार जनता पसंत करेल, अशी चिंता आंबेडकरांनी अचूकपणे व्यक्त केली होती. परंतु स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षात या भ्रामक पर्यायाच्या सापळ््यात न अडकण्यासाठी आपण सावध राहायला हवे. (वृत्तसंस्था)>वाढते अत्याचार अस्वीकार्यडॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, भारतीय समाजात सध्या धर्म, जात, भाषा व संस्कृतीच्या आधारे फूट पाडण्याचे केले जात असलेले प्रयत्न चिंताजनक आहेत. अल्पसंख्यक आणि दलितांवरील अत्याचारही वाढत आहेत. अशा फुटपाडू धोरणांचा व राजकारणाचा नागरिक म्हणून आपण एकदिलाने विरोध करायला हवा. कारण हे थांबविले नाही, तर ते लोकशाहीला मारक ठरेल.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंग