शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

28 किमी पायपीट करत नवरदेवाने गाठला मंडप; चालकांच्या संपाचा फटका, रात्रभर चालून पोहोचले वधूच्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 09:22 IST

ओडिशाच्या रायगढ जिल्ह्यात ही घटना घडली. लग्नात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना ही घटना कायम स्मरणात राहील.

भुवनेश्वर : ओडिशातील व्यावसायिक वाहनांच्या चालकांच्या संपाचा एका नवरदेवास चांगलाच फटका बसला. संपामुळे वाहनांची व्यवस्था न झाल्यामुळे नवरदेवासह सर्व वऱ्हाडी मंडळींना रात्रभर २८ किलोमीटर चालत-चालत नवरीच्या घरी पोहोचावे लागले. ओडिशाच्या रायगढ जिल्ह्यात ही घटना घडली. लग्नात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना ही घटना कायम स्मरणात राहील.

कल्याणसिंहपूर तालुक्यातील सुनाखडी येथून हे  वऱ्हाड गुरुवारी रात्री पायी निघाले. रात्रभर चालून ते सकाळी दिबालापाडू येथे विवाहस्थळी पोहोचले. विवाह सोहळा व्यवस्थित पार पडला. मात्र, या वऱ्हाडाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. वऱ्हाडाचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. (वृत्तसंस्था)

कशासाठी आहे संप?-ओडिशातील वाहनचालकांची एक संघटना ‘एकता महासंघा’ने दिलेल्या माहितीनुसार, विमा, निवृत्तीवेतन आणि कल्याण बोर्ड स्थापन करण्याची वाहनचालकांची मागणी आहे. त्यासाठी ओडिशातील सर्व व्यावसायिक वाहनचालकांनी बुधवारी संपाची घोषणा केली होती. - वास्तविक, सरकारच्या आश्वासनामुळे चालकांनी आपला संप ९० दिवसांसाठी स्थगित केला आहे. ९० दिवसांत मागणी मान्य न झाल्यास पुन्हा संप पुकारला जाईल, असे संघटनेने म्हटले आहे.

२२ वर्षीय नरेश प्रस्का असे नवरदेवाचे नाव आहे. लग्नस्थळी पोहोचण्यासाठी ते १६ मार्च रोजी निघाले. वऱ्हाडासाठी त्याने ४ एसयूव्ही वाहनांची व्यवस्था केली होती. मात्र, चालकांच्या संपामुळे यापैकी एकही वाहन आले नाही. नरेशने सांगितले की, आम्ही आवश्यक सामान दुचाकी वाहनांद्वारे विवाहस्थळी पाठवून दिले. त्यानंतर ८ महिलांसह आम्ही सुमारे ३० वऱ्हाडी पायीच निघालो. हा अनुभव अविस्मरणीय राहिला, हे मात्र खरे. आमच्यासमोर अन्य कोणता पर्यायच नव्हता. कारण, एकही चालक चालण्यास तयार नव्हता. 

टॅग्स :Odishaओदिशा