शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारतात महापुराचे थैमान

By admin | Updated: August 25, 2016 06:24 IST

उत्तर भारतातील पाच राज्यांना महापुराचा जोरदार फटका बसला असून, अनेक नद्या पात्राबाहेर आल्या आहेत.

उत्तर भारतातील पाच राज्यांना महापुराचा जोरदार फटका बसला असून, अनेक नद्या पात्राबाहेर आल्या आहेत. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. अलाहाबादेत पुराचे पाणी शहरात पोहोचले आहे आणि गंगेचे रूप सागराप्रमाणे दिसू लागले आहे. उत्तर प्रदेशातून एक लाखाहून अधिक, तर बिहारमधील पूरग्रस्त भागातून जवळपास सहा लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या पुरामुळे उत्तर प्रदेशात नऊ, बिहारमध्ये १५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच मध्य प्रदेशातही अनेकांचा बळी गेला आहे. गंगा नदी धोक्याच्या पातळीपेक्षा २३ सेंमीवरून वाहत आहे. कालिचक ब्लॉक नं. ३, माणिकचक आणि रतुआ ब्लॉक नं. १ या भागांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. सिंचन विभागाचे एक उच्चस्तरीय पथक या भागाचा दौरा करीत असून, आपला अहवाल ते सादर करणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले. >बोटीत झाला बाळाचा जन्मपूरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी जात असताना एका महिलेने बोटीतच बाळाला जन्म दिला. सुदैवाने एनडीआरएफमधील फार्मासिस्ट त्या वेळी बोटीवर उपस्थित होते. त्यांनी बाळंतपणासाठी तिला मदत केली.१३५ घरे गेली वाहून मालदा : पश्चिम बंगालमधील गंगा नदी मालदा जिल्ह्यात धोक्याची पातळी ओलांंडून वाहत आहे. या पुरात १३५ घरे वाहून गेली आहेत, तर २० गावांत पुराचे पाणी शिरल्याने अनेक नागरिक बेघर झाले आहेत. मालदातील अतिरिक्त जिल्हाधिकारी कांचन चौधरी यांनी सांगितले की, बिननगर भागातील १३५ घरे या पुरात वाहून गेली आहेत, तर या पुरामुळे अनेक रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे.