शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

उत्तर भारतात महापुराचे थैमान

By admin | Updated: August 25, 2016 06:24 IST

उत्तर भारतातील पाच राज्यांना महापुराचा जोरदार फटका बसला असून, अनेक नद्या पात्राबाहेर आल्या आहेत.

उत्तर भारतातील पाच राज्यांना महापुराचा जोरदार फटका बसला असून, अनेक नद्या पात्राबाहेर आल्या आहेत. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. अलाहाबादेत पुराचे पाणी शहरात पोहोचले आहे आणि गंगेचे रूप सागराप्रमाणे दिसू लागले आहे. उत्तर प्रदेशातून एक लाखाहून अधिक, तर बिहारमधील पूरग्रस्त भागातून जवळपास सहा लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या पुरामुळे उत्तर प्रदेशात नऊ, बिहारमध्ये १५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच मध्य प्रदेशातही अनेकांचा बळी गेला आहे. गंगा नदी धोक्याच्या पातळीपेक्षा २३ सेंमीवरून वाहत आहे. कालिचक ब्लॉक नं. ३, माणिकचक आणि रतुआ ब्लॉक नं. १ या भागांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. सिंचन विभागाचे एक उच्चस्तरीय पथक या भागाचा दौरा करीत असून, आपला अहवाल ते सादर करणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले. >बोटीत झाला बाळाचा जन्मपूरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी जात असताना एका महिलेने बोटीतच बाळाला जन्म दिला. सुदैवाने एनडीआरएफमधील फार्मासिस्ट त्या वेळी बोटीवर उपस्थित होते. त्यांनी बाळंतपणासाठी तिला मदत केली.१३५ घरे गेली वाहून मालदा : पश्चिम बंगालमधील गंगा नदी मालदा जिल्ह्यात धोक्याची पातळी ओलांंडून वाहत आहे. या पुरात १३५ घरे वाहून गेली आहेत, तर २० गावांत पुराचे पाणी शिरल्याने अनेक नागरिक बेघर झाले आहेत. मालदातील अतिरिक्त जिल्हाधिकारी कांचन चौधरी यांनी सांगितले की, बिननगर भागातील १३५ घरे या पुरात वाहून गेली आहेत, तर या पुरामुळे अनेक रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे.