शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

मोठमोठी आश्वासने; पण ती अमलात येणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 04:50 IST

राजस्थानात प्रचाराची मुदत संपण्यास एकच दिवस शिल्लक उरला आहे. त्यामुळे काँग्रेस-भाजपा आणि स्थानिक पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

- सुहास शेलारजयपूर : राजस्थानात प्रचाराची मुदत संपण्यास एकच दिवस शिल्लक उरला आहे. त्यामुळे काँग्रेस-भाजपा आणि स्थानिक पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. जिथे अटीतटीचा संघर्ष होण्याची शक्यता आहे, अशा मतदारसंघांत नेत्यांनी तळ ठोकला आहे. पंच, सरपंच व जातप्रमुखांना हाताशी धरून समीकरणे बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजस्थानातील पावणेपाच कोटी मतदारांपैकी ६७ टक्के मतदार शेतकरी आहेत आणि २५ लाखांहून अधिक मतदार शेतमजुरीचे काम करतात. त्यामुळे राजस्थानात सत्ता कोणाची? याचे भवितव्य शेतकऱ्यांच्या हाती आहे. त्यामुळे या वर्गाच्या मतांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.कर्जबाजारीला कंटाळून शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण राजस्थानातही वाढले आहे. त्या रोखण्यासाठी आधी अशोक गेहलोत (२००८) आणि त्यानंतर वसुंधरा राजे (२०१३) यांनी कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. वसुंधरा राजे यांनी २०१३ च्या जाहीरनाम्यातून अल्प दरात कृषीकर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. मात्र, निवडून आल्यानंतर ती घोषणा हवेतच विरली. त्यामुळे शेतकरी त्यांच्यावर नाराज आहेत.ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी २०१८ च्या अर्थसंकल्पातून शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी ८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र, या योजनेचा लाभ ज्यांना मिळाला नाही, अशा शेतकºयांनी सरसकट सर्व शेतकºयांना कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले. सरकारने हे आंदोलन दडपण्यासाठी शेतकरी नेत्यांना अटक केली. त्यामुळे आंदोलन चिघळले व खवळलेल्या शेतकºयांनी चक्काजाम, रेलरोको केला. त्यावेळेस शेतकºयांच्या भावना लक्षात घेऊन सरकारला कर्जमाफी यादीची फेररचना करावी लागली होती. राजस्थानात सत्तेवर येताच पहिल्या दहा दिवसांत शेतकºयांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. जाहीरनाम्यातूनही याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. वसुंधरा राजे सरकारवर नाराज असलेल्या शेतकºयांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न काँग्रसने केला आहे.कोणताही पक्ष जरी सत्तेवर आला तरी १० दिवसांत संपूर्ण कर्जमाफी देईल का, हा प्रश्नच आहे. गेल्या काही निवडणुकांत आलटून पालटून सत्तेवर आलेल्या काँग्रेस, भाजपाने शेतकरी व कष्टकरी वर्गाला मोठमोठी आश्वासने दिली. परंतु त्यापैकी किती पूर्ण केली, हे शेतकºयांना पूर्णपणे ज्ञात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कोणत्या पक्षाच्या बाजूने मतदान करतात, यावरच विद्यमान सरकार टिकते की सत्ताबदल होतो हे ठरेल.>‘गजेंद्रसिंह फॉर्म्युला’ यशस्वी ठरणार का?वसुंधरा राजे सरकारविरोधी भावना असलेल्या शेतकºयांचे मतपरिवर्तन करण्याची जबाबदारी अमित शहा यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री तथा राजस्थानचे नेते गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे दिली आहे. गजेंद्रसिंह हे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे संस्थापक सदस्य भैरो सिंह शेखावत यांचे पुत्र आहेत. शेतकरी नेत्यांशी त्यांची जवळीक आहे. शिवाय त्यांना मानणारा मोठा वर्गही आहे. एकीकडे वसुंधरा राजे यांच्याविषयी शेतकºयांत तीव्र असंतोष असताना, अमित शहा यांचा गजेंद्रसिंह ‘फॉर्म्युला’ राजस्थानात कितपत यशस्वी ठरतो, याबाबत मात्र प्रश्नचिन्हच आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक