शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शेजारी देशांतील अधिक मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व दिले - निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 04:24 IST

मोदी सरकारने २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत १,५९५ पाकिस्तानी स्थलांतरितांना व अफगाणिस्तानातून आलेल्या ३९१ मुस्लिमांना नागरिकत्व दिले

चेन्नई : अलीकडेच लागू करण्यात आलेला सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) मुस्लिमांना पक्षपाती वागणूक देणारा आहे, हा आरोप निखालस खोटा आणि बिनबुडाचा आहे, असा दावा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी रविवारी येथे केला आणि खरे तर मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून शेजारी देशांतून आलेल्या अधिक निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले.‘सीएए’च्या संदर्भात भारतीय जनता पार्टीने हाती घेतलेल्या देशव्यापी ‘जन जागरण अभियाना’चा एक भाग म्हणून येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सितारामन म्हणाल्या की, सन २०१४मध्ये मोदी सरकार सत्तेवर येईपर्यंत पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानातून आलेल्या ५६६ मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते. मोदी सरकारने २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत १,५९५ पाकिस्तानी स्थलांतरितांना व अफगाणिस्तानातून आलेल्या ३९१ मुस्लिमांना नागरिकत्व दिले. पाकिस्तानी गायक अदनान सामी व बांगलादेशच्या लेखिका तस्लीमा नसरीन यांना दिलेले नागरिकत्व ही याची ठळक उदाहरणे आहेत, असे त्या म्हणाल्या. एकट्या गेल्या वर्षात २,८३८ पाकिस्तानी, ९४८ अफगाण व १७२ बांगलादेशी स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व दिले गेले. (वृत्तसंस्था)निर्वासित छावण्यात ५०-६० वर्षेपूर्वीच्या पूर्व पाकिस्तानमधून आलेले लोक देशाच्या विविध भागांतील निर्वासित छावण्यांमध्ये गेली ५०-६० वर्षे राहत आहेत. या छावण्यांमधील लोकांची अवस्था पाहिलीत तर हृदय पिळवटून जाईल. श्रीलंकेतून आलेले निर्वासितही अशाच छावण्यांमध्ये कोणत्याही मूलभूत सुविधांविना राहत आहेत, असे सांगून सीतारामन म्हणाल्या की, या लोकांना अधिक चांगले आयुष्य जगता यावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला नाही.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनCentral Governmentकेंद्र सरकारcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक