शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

शेजारी देशांतील अधिक मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व दिले - निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 04:24 IST

मोदी सरकारने २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत १,५९५ पाकिस्तानी स्थलांतरितांना व अफगाणिस्तानातून आलेल्या ३९१ मुस्लिमांना नागरिकत्व दिले

चेन्नई : अलीकडेच लागू करण्यात आलेला सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) मुस्लिमांना पक्षपाती वागणूक देणारा आहे, हा आरोप निखालस खोटा आणि बिनबुडाचा आहे, असा दावा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी रविवारी येथे केला आणि खरे तर मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून शेजारी देशांतून आलेल्या अधिक निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले.‘सीएए’च्या संदर्भात भारतीय जनता पार्टीने हाती घेतलेल्या देशव्यापी ‘जन जागरण अभियाना’चा एक भाग म्हणून येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सितारामन म्हणाल्या की, सन २०१४मध्ये मोदी सरकार सत्तेवर येईपर्यंत पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानातून आलेल्या ५६६ मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते. मोदी सरकारने २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत १,५९५ पाकिस्तानी स्थलांतरितांना व अफगाणिस्तानातून आलेल्या ३९१ मुस्लिमांना नागरिकत्व दिले. पाकिस्तानी गायक अदनान सामी व बांगलादेशच्या लेखिका तस्लीमा नसरीन यांना दिलेले नागरिकत्व ही याची ठळक उदाहरणे आहेत, असे त्या म्हणाल्या. एकट्या गेल्या वर्षात २,८३८ पाकिस्तानी, ९४८ अफगाण व १७२ बांगलादेशी स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व दिले गेले. (वृत्तसंस्था)निर्वासित छावण्यात ५०-६० वर्षेपूर्वीच्या पूर्व पाकिस्तानमधून आलेले लोक देशाच्या विविध भागांतील निर्वासित छावण्यांमध्ये गेली ५०-६० वर्षे राहत आहेत. या छावण्यांमधील लोकांची अवस्था पाहिलीत तर हृदय पिळवटून जाईल. श्रीलंकेतून आलेले निर्वासितही अशाच छावण्यांमध्ये कोणत्याही मूलभूत सुविधांविना राहत आहेत, असे सांगून सीतारामन म्हणाल्या की, या लोकांना अधिक चांगले आयुष्य जगता यावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला नाही.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनCentral Governmentकेंद्र सरकारcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक