संजय कांबळे, वरपगांवविधानसभा निवडणुकीच्या काळात सर्वच प्रमुख पक्षांच्या युत्या, आघाड्या तुटल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांचा या ना त्या कारणाने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असताना याच लगीनघाईत तालुक्यातील दहागाव या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्याने एकदा विधानसभेसाठी मतदार केल्यानंतर परत ग्रामपंचायतीकरिता कसे मतदार करायचे? शिवाय, बोटाला लावलेल्या शाईचे काय, असा मोठा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.शनिवार-२७ सप्टेंबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, शनिवार-४ आॅक्टोबर अर्ज सादर करणे, मंगळवार-७ आॅक्टोबर छाननी, ९ आॅक्टोंबरला अर्ज मागे घेणे आणि शनिवार-१८ आॅक्टोबरला मतदान आहे. म्हणजे विधानसभेच्या वेळी मतदान करताना बोटाला लावलेली शाई तीन दिवसांत कशी पुसायची, असा प्रश्न दहागाव ग्रामस्थांना पडला आहे.आॅक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दहागाव ग्रामपंचायतीचा समावेश असून ७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता होती.दहागावमध्ये अनुसूचित जाती ७, अनुसूचित जमाती १४६, इतर ७८९ अशी एकूण ९४२ लोकसंख्या आहे. त्यामुळे आमदारांसाठी प्रचार करायचा की, स्वत:च्या ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घालायचे, अशा द्विधा मन:स्थितीत मतदार सापडले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या लगीनघाईच्या वरातीमागून ग्रामपंचायतीचे घोडे असे ग्रामस्थ म्हणत आहेत.
विधानसभेनंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका!
By admin | Updated: September 27, 2014 00:25 IST