शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सरकार-न्यायालय वाद वाढणार, नवीन व्यवस्था येईपर्यंत रिक्त पदांचा प्रश्न रेंगाळणार : कायदा मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 06:40 IST

लोकसभेत बुधवारी तृणमूल खासदार महुआ मोईत्रा आणि अर्थमंत्री सीतारामन यांची जुगलबंदी चांगलीच रंगली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जोपर्यंत नवीन प्रणाली तयार होत नाही, तोपर्यंत उच्च न्यायव्यवस्थेतील रिक्त पदे आणि नियुक्त्यांचा मुद्दा रेंगाळत राहील, असे कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी राज्यसभेत स्पष्ट केले. या नियुक्त्यांवरून सरकार आणि सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू असताना रिजिजू यांनी ही माहिती दिली. 

 कायदामंत्री म्हणाले की, न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत केंद्राकडे मर्यादित अधिकार आहेत. ९ डिसेंबरपर्यंत, मंजूर १,१०८ पदांपैकी उच्च न्यायालयांमध्ये ७७७ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. त्यामुळे ३३१ (३० टक्के) पदे रिक्त आहेत. प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान पूरक प्रश्नांची उत्तरे देताना रिजिजू म्हणाले की, विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या एकूण खटल्यांची संख्या सुमारे पाच कोटींवर पोहोचली आहे. प्रलंबित असलेल्या खटल्यांचा परिणाम जनतेवर होत आहे.

पप्पू संसदेत नव्हे तुमच्या घरात सापडेललोकसभेत बुधवारी तृणमूल खासदार महुआ मोईत्रा आणि अर्थमंत्री सीतारामन यांची जुगलबंदी चांगलीच रंगली होती. मोईत्रा यांनी आकडेवारी सादर करीत सरकार आणि अतिरिक्त अनुदान खोटे असल्याचे म्हटले होते. त्यावर अर्थमंत्र्यांनी पप्पूला संसदेत किंवा इतरत्र कुठेही शोधू नका, तुम्हाला तो तुमच्याच घरात (पश्चिम बंगाल) सापडेल, असा सल्ला दिला.

टॅग्स :Parliamentसंसद