शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

राज्यकर्त्यांना कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

मोरे : महापालिकेच्या वतीने नागरी सत्कार

मोरे : महापालिकेच्या वतीने नागरी सत्कार
नाशिक : राजकारण्यांना कोणतेही क्षेत्र वर्ज्य नसते, साहित्य संमेलनात त्यांची हजेरी हा वादाचा मुद्दा नसावा, असे मत घुमान येथे होणार्‍या ८८व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाशिक महापालिकेच्या वतीने महापौरांच्या निवासस्थानी आयोजित सत्कार सोहळ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, राजकारणी लोकांना साहित्य संमेलनाचे वावडे नसावे. परंतु त्या दोघांनीही औचित्याचा मुद्दा टाळायला हवा. राजकारणी साहित्यिकांना मदत करतात. त्यातून आपण साहित्यिकांवर उपकार करीत आहोत ही भावना नसावी, असेही ते म्हणाले.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड एकमताने व्हावी, असे आपल्यालाही वाटते. परंतु लोकशाहीमुळे निवडणुका ही अपरिहार्य बाब झाली आहे. निवडणूक ही वाईट गोष्ट नाही, मात्र ती कशी लढवली जाते, यावरच सर्व काही अवलंबून आहे. घुमान येथे होणार्‍या वादावर ते म्हणाले की, मला माझ्या संवादावर विश्वास आहे आणि समर्थ रामदासांनी म्हटलेच आहे, सुटे तो वाद संवाद. त्यामुळे या वादाबद्दल चिंता असण्याचे कारण नाही. महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा देणारे हे संमेलन असून, मराठ्यांनी युद्धात अटकेपार झेंडे रोवले त्या पराक्रमाची पुनरावृत्ती घडण्याची ही घटना असल्याचेही ते म्हणाले.
कोणत्याही मान्यवर व्यक्तीबद्दल अवमानकारक बोलू नये, अपशब्द वापरू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्याबाबत बोलताना त्यांनी हे उद्गार काढले. याप्रसंगी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, अण्णा झेंडे आदि उपस्थित होते.