शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

"सर्वांना न्याय देण्याची सरकारची भूमिका", अर्थसंकल्पापूर्वी रामदास आठवलेंचं भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 19:19 IST

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडून देशातील जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प उद्या (२३ जुलै) सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडून देशातील जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी अर्थसंकल्पाबाबत भाकीत वर्तवलं आहे.

हा अर्थसंकल्प १४० कोटी लोकांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक न्याय देणारे असणार आहे. या अर्थसंकल्पात विकासासाठी भरघोस निधी देण्याबाबत घोषणा होईल. पंतप्रधान मोदींचा विचार आहे की समाजातील प्रत्येक वर्गाला आणि धर्माला न्याय मिळाला पाहिजे. सर्वांना न्याय देण्याची भूमिका या अर्थसंकल्पात असेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

सोमवारी रामदास आठवले यांनी एएनआयशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "शेतकरी, गरीब, युवा किंवा महिला असतील. सर्वांना न्याय देण्याची सरकारची भूमिका असणार आहे. अर्थसंकल्प प्रशंसनीय राहील. अर्थसंकल्प उत्तम असेल. २०२४-२५ चा अर्थसंकल्प देशाला आर्थिक न्याय आणि सामाजिक न्याय देणारा अर्थसंकल्प असेल."

आर्थिक सर्व्हेमध्ये जीडीपीबाबत वर्तवण्यात आलेल्या अंदाजाबाबत रामदास आठवले म्हणाले की, ज्याप्रकारे सभागृहात अर्थसंकल्पाबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यात जीडीपी वाढणार आहे आणि आर्थिक दृष्टिकोनातून अर्थसंकल्प चांगला असणार आहे. आमचा प्रयत्न असेल की समाजातील सगळ्या वर्गाचे उत्पन्न वाढावे, गरीबी रेषेच्या खाली असलेले त्यातून बाहेर यावेत. मागील दहा वर्षांमध्ये २५ कोटी लोक गरीबी रेषेच्या वर आले आहेत. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना न्याय देणारा असणार आहे.

याशिवाय, रामदास आठवले म्हणाले की, "हा अर्थसंकल्प मध्यवर्गास न्याय देणारा असणार आहे. तसेच, औद्योगिक विकासाला चालना देणारा असेल, जेणेकरून बेरोजगारांना रोजगार मिळेल. हा अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण आहे. आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांकाना न्याय देण्याचं काम हा अर्थसंकल्प करेल. शिक्षण क्षेत्रात प्रगती घडवणारा हा अर्थसंकल्प असेल."

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेBudgetअर्थसंकल्प 2024lok sabhaलोकसभा