शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

मनरेगासाठी सरकारचे यंदा विक्रमी पेमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 04:13 IST

चालू वित्त वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत सरकारने कामगारांना विक्रमी पेमेंट केले आहे. उरलेल्या चार महिन्यांसाठी आता योजनेचा केवळ १० टक्के निधी उरला आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीनंतर ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’अंतर्गत (मनरेगा) काम मागण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे चालू वित्त वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत सरकारने कामगारांना विक्रमी पेमेंट केले आहे. उरलेल्या चार महिन्यांसाठी आता योजनेचा केवळ १० टक्के निधी उरला आहे.ग्रामविकास मंत्रालयाने मनरेगासाठी यंदाच्या वित्त वर्षाकरिता ८४,९०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातील ७६,८०० कोटी रुपये एप्रिल-नोव्हेंबर या आठ महिन्यांत खर्च झाले आहेत. गेल्यावर्षी या काळात ५० हजार कोटी रुपये खर्च झाले होते. यंदा अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा १२ टक्के अधिक खर्च झाला आहे. या वित्त वर्षाचे आणखी चार महिने शिल्लक आहेत. तथापि, करण्यात आलेल्या तरतुदीपैकी फक्त १० टक्केच रक्कम आता उरली आहे.आणखी निधी उपलब्ध करुन देणारवित्त मंत्रालयाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, मनरेगासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. गरज भासल्यास आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल. मनरेगाअंतर्गत एका कुटुंबास १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो. यंदा नोव्हेंबरपर्यंत १० दशलक्ष कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या २४३ टक्के अधिक आहे.