शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महागाई कमी करण्यास सरकारचे प्राधान्य - राष्ट्रपती

By admin | Updated: June 9, 2014 13:07 IST

'सबका साथ, सबका विकास' हेच सरकारचे ध्येय असल्याचे सांगत महागाई कमी करणे, काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन,२०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबासाठी पक्के घर व २४ तास वीज अशा अनेक मुद्यांचा अजेंडा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिभाषणात मांडला.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - 'सबका साथ, सबका विकास' हेच सरकारचे ध्येय असल्याचे सांगत महागाई कमी करणे, काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन, महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण, २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबासाठी पक्के घर, शौचालय व २४ तास वीजपुरवठा अशा अनेक मुद्यांचा अजेंडा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिभाषणात मांडला. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान,सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. आपल्या अभिभाषणादरम्यान त्यांनी आगामी काळात देशाच्या विकासासाठी मोदी सरकारचा काय अजेंडा असेल, याचा आढावा जाहीर केला.
यावेळी त्यांनी लोकसभेच्या निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोगाचे कौतुक केले, तसेच लोकसभेच्या दुस-या महिला सभापती सुमित्रा महाजन यांचेही अभिनंदन केले. 
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे :- 
-नव्या सरकारला मिळालेले बहुमत हा आशेचा किरण. 
- सर्वांसोबत सर्वांचा विकास हेच ध्येय
- जनतेची सेवा करण्यासाठी तसेच गरिबी दूर करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असेल. 
- नव्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नसेल. 
- दहशतवादाबाबत सरकार ठोस भूमिका घेणार. 
- काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न करणार
- प्रत्येक कुटुंबासाठी पक्के घर, शौचालय, २४ तास वीजपुरवठा हे सरकारपुढील २०२२ पर्यंतचे लक्ष्य
- प्रत्येक गाव ब्रॉडबॅंडने जोडणार. 
- हाय स्पीड ट्रेन्ससाठी डायमंड क्वॉड्रिलेटरल प्रकल्प सुरू करणार
- काळा पैसा देशात परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध
- 100 नवी शहरं बनवली जाणार
- महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण देणार
- संरक्षण दलामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- राष्ट्रपती
- राष्ट्रीय ई-लायब्ररीची स्थापना, तसेच प्रत्येक राज्यांत आयआयटी व आयआयएमची स्थापना करणार
- 'बेची बचाओ, बेटी बढाओ' योजनेअंतर्गत मुलींची संख्या वाढविण्यास मदत करणार.
- स्वच्छ भारत अभियान लौकरच सुरू होणार
- रोजगारवाढीसाठी पर्यटनावर भर देणार 
- रेल्वेमधील सुरक्षा आणखी मजबूत करणार - ऊर्जा क्षेत्राचा विकास करणार
- मदरशांना आधुनिक बनवणार.