शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

सरकारची वाटचाल योग्य दिशेने; CAA, कलम 370 वरून टीका करणाऱ्यांना मोदींचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 10:01 IST

विकास करत कामकाज करणे हा सरकारचा दृढ निश्चय आहे. सध्याच्या स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी दृढ प्रतिज्ञा केली असल्याचे सांगत मोदींनी सरकारच्या निर्णयांचे कौतुक केले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सरकारच्या नागरिकता संशोधन कायदा आणि जम्मू काश्मीरचा काढण्यात आलेल्या विशेष दर्जाच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. योग्य दिशेने जात असलेल्यांवर आज 'खरं बोलणारे' टीका करतात असा खोचक टोला मोदींनी विरोधकांना लगावला. एका कार्यक्रमात ते बोलत होते.

जगभरातील स्थलांतरीतांच्या अधिकाराच्या गोष्टी करणारी गँग आता शेजारील देशातील अल्पसंख्यांकाना नागरिकता देण्याच्या भारताच्या निर्णयाचा विरोध करत आहेत. ही गँग संविधानाची गोष्ट करते. मात्र जम्मू काश्मीरमधील कलम 370  हटविणे आणि भारतीय संविधान पूर्णपणे अंमलात आणण्यास विरोध करते. योग्य कृतीवर बोलणे चूक नाही. मात्र या लोकांमध्ये सरकारविषयी राग आहे. देशातील सध्याची स्थिती बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नात देखील त्यांना गडबड दिसते, असंही मोदींनी सांगितले.

दरम्यान विकास करत कामकाज करणे हा सरकारचा दृढ निश्चय आहे. सध्याच्या स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी दृढ प्रतिज्ञा केली असल्याचे सांगत मोदींनी सरकारच्या निर्णयांचे कौतुक केले. आता अनुदान लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात येते. त्यामुळे हजारो कोटींची बचत झाली. त्याचप्रमाणे रेरा कायद्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला वाचविण्यास मदत झाली असून देश सतत पुढे जात असल्याचे मोदींनी सांगितले.