शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

सरकारची वाटचाल योग्य दिशेने; CAA, कलम 370 वरून टीका करणाऱ्यांना मोदींचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 10:01 IST

विकास करत कामकाज करणे हा सरकारचा दृढ निश्चय आहे. सध्याच्या स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी दृढ प्रतिज्ञा केली असल्याचे सांगत मोदींनी सरकारच्या निर्णयांचे कौतुक केले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सरकारच्या नागरिकता संशोधन कायदा आणि जम्मू काश्मीरचा काढण्यात आलेल्या विशेष दर्जाच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. योग्य दिशेने जात असलेल्यांवर आज 'खरं बोलणारे' टीका करतात असा खोचक टोला मोदींनी विरोधकांना लगावला. एका कार्यक्रमात ते बोलत होते.

जगभरातील स्थलांतरीतांच्या अधिकाराच्या गोष्टी करणारी गँग आता शेजारील देशातील अल्पसंख्यांकाना नागरिकता देण्याच्या भारताच्या निर्णयाचा विरोध करत आहेत. ही गँग संविधानाची गोष्ट करते. मात्र जम्मू काश्मीरमधील कलम 370  हटविणे आणि भारतीय संविधान पूर्णपणे अंमलात आणण्यास विरोध करते. योग्य कृतीवर बोलणे चूक नाही. मात्र या लोकांमध्ये सरकारविषयी राग आहे. देशातील सध्याची स्थिती बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नात देखील त्यांना गडबड दिसते, असंही मोदींनी सांगितले.

दरम्यान विकास करत कामकाज करणे हा सरकारचा दृढ निश्चय आहे. सध्याच्या स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी दृढ प्रतिज्ञा केली असल्याचे सांगत मोदींनी सरकारच्या निर्णयांचे कौतुक केले. आता अनुदान लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात येते. त्यामुळे हजारो कोटींची बचत झाली. त्याचप्रमाणे रेरा कायद्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला वाचविण्यास मदत झाली असून देश सतत पुढे जात असल्याचे मोदींनी सांगितले.