शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
3
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
4
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
5
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
6
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
7
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
8
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
9
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
10
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
11
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
12
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
13
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
14
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
15
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
16
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
17
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
18
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
19
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
20
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

२0 लाख लोकांना सरकार देणार रोजगार; केंद्र व राज्यांतील पदे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 06:14 IST

केंद्र आणि राज्य सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २० लाख रिक्त पदे भरणार आहे. त्यातील २ लाखांहून अधिक पदे रेल्वेतील असून, ती भरण्याची घोषणा आधीच झाली आहे.

नवी दिल्ली : देशात वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावरून विरोधकांनी टीका सुरू केल्यामुळे मोदी सरकारने जोरात हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २० लाख रिक्त पदे भरणार आहे. त्यातील २ लाखांहून अधिक पदे रेल्वेतील असून, ती भरण्याची घोषणा आधीच झाली आहे. या मेगाभरतीची सुरुवात केंद्राची विविध खाती व सार्वजनिक क्षेत्रातील २४४ कंपन्यांपासून होण्याची शक्यता आहे.केंद्रीय कामगार मंत्रालयाने या मेगाभरतीसाठी पुढाकार घेतला आहे. कामगार मंत्रालय सध्या विविध खात्यांमध्ये असलेल्या रिकाम्या पदांची माहिती घेत आहे. ती मिळाल्यानंतर नव्या योजनेचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक तत्त्वावर ही पदे भरण्यात येतील, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाºयाने दिली.प्रशासनावर होणारा खर्च कमी करण्यासाठी केंद्र तसेच अनेक राज्यांनी नोकरभरती थांबवली होती. त्यामुळे अनेक पदे बºयाच वर्षांपासून रिक्त आहेत. पण येत्या काही महिन्यांत हे चित्र बदलेल, असे सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्येच सध्या ६ लाखांहून अधिक जागा रिकाम्या आहेत.केंद्रीय पातळीवर ही योजना यशस्वी झाल्यास राज्यांच्या पातळीवरदेखील ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, असे अधिकाºयाने सांगितले.या मेगाभरतीद्वारे सुमारे २० लाख युवकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. कामगार मंत्रालयाकडून लवकरच सर्व खात्यांकडून तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे.निवडणुका जवळ आल्यामुळे..?नरेंद्र मोदी यांनी २0१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात, आम्ही सत्तेवर आल्यास दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ , असे आश्वासन दिले होते.पण प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षांत तेवढे रोजगार निर्माण होणे सोडूनच द्या, पण अनेक जणांचा असलेला रोजगारच हिरावून घेतला गेला.खासगी उद्योगांमध्ये तर रोजगारनिर्मिती तर थांबल्यातच जमा आहे. त्यामुळे रोजगाराच्या प्रश्नावरून केंद्र सरकार व विशेषत: पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. म्हणून लोकसभा निवडणुका दोन वर्षांवर आल्या असताना हे पाऊ ल उचलण्यात येत आहे.6,00000 अधिक जागा केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्येच रिकाम्या...

टॅग्स :Governmentसरकार