शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

सरकार झुकले

By admin | Updated: August 31, 2015 02:23 IST

वादग्रस्त भूसंपादन वटहुकुमाची मुदत सोमवारी ३१ आॅगस्ट रोजी संपत असताना यापुढे पुन्हा वटहुकूम आणला जाणार नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

नवी दिल्ली : वादग्रस्त भूसंपादन वटहुकुमाची मुदत सोमवारी ३१ आॅगस्ट रोजी संपत असताना यापुढे पुन्हा वटहुकूम आणला जाणार नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात केली आहे. संसदेत आणि बाहेर जोरदार विरोध झाल्यानंतरही तीनदा वटहुकूम जारी करीत या कायद्याचा हेका कायम ठेवणाऱ्या सरकारला अखेर नमते घ्यावे लागल्याचे त्यातून स्पष्ट झाले. प्रलंबित भूसंपादन विधेयकाबाबत शेतकऱ्यांच्या हिताच्या सूचना व शिफारशी स्वीकारण्याची तयारी असल्याचेही मोदींनी सूचित केले. गावकरी व गावांच्या भल्यासाठी २०१३च्या कायद्यात अनेक राज्यांनी सुधारणा सुचविल्या होत्या. त्यानुसार बदल करण्यात आले; मात्र विरोधकांनी या विधेयकाबद्दल प्रचंड गैरसमज निर्माण केल्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या विधेयकाबद्दल वाद निर्माण झाले होते. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कोणताही निर्णय घेण्याची तयारी असल्याचे ते म्हणाले.निम्न पदांसाठी मुलाखतींना फाटाकाही सरकारी नोकऱ्यांसाठी मुलाखतींची अनिवार्यता संपुष्टात आणण्याबाबत सरकार काम करीत आहे. निम्न पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या मुलाखती हे भ्रष्टाचाराचे कारण ठरत असल्याचे दिसते. निम्न पदांसाठी मुलाखतींची आवश्यकता आहे काय? मुलाखतीला बोलावले जाते तेव्हा गरीब पालक शिफारस आणि वशिल्यासाठी ठिकठिकाणी चकरा मारतात. भरती करताना मुलाखती हेच भ्रष्टाचाराचे कारण ठरते. - नरेंद्र मोदीशेतकऱ्यांचा आवाज महत्त्वाचा भूसंपादन वटहुकूम संपुष्टात येऊ देण्याचा निर्णय मी घेतला आहे. याचा अर्थ माझ्या सरकारने सूत्रे स्वीकारण्यापूर्वीची स्थिती कायम राहील. माझ्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज सर्वाधिक महत्त्वाचा आहे.हे विधेयक संसदेत पारित न झाल्यामुळे तीनवेळा वटहुकूम जारी करावा लागला, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी २० मिनिटांच्या भाषणात या विधेयकामागची भूमिका स्पष्ट करण्यावर अधिक वेळ दिला. राज्यांनी भूसंपादन विधेयकात अनेक सुधारणा सुचविल्या, त्या स्वीकारल्या. जलसिंचनासाठी बंधारे, विजेचे खांब, रस्ते, गरीब गावकऱ्यांसाठी घरे उभारण्याची तसेच हा कायदा नोकरशहाच्या कचाट्यातून मुक्त ठेवण्याचा उद्देश होता. सरकारने विधेयक आणल्यानंतर विरोधकांनी खूप गैरसमज निर्माण करीत शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण केली. आता शंकेचे कारण असणार नाही. तुम्ही घाबरण्याचे काही कारण नाही, असे ते शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले. भूसंपादन वटहुकूम पुन्हा जारी न करण्याचा निर्णय घेऊन मोदी सरकारला जनतेसमोर अखेर झुकावे लागले. हे सरकार शेतकरीविरोधी असून, शेतकऱ्यांच्या जमिनी श्रीमंत मित्रांमध्ये वाटून देण्याचा त्यांचा डाव आहे. आम्ही संसदेत शेतकऱ्यांच्या हितासाठी लढलो. त्यामुळेच सरकारला झुकावे लागले. - सोनिया गांधीजनतेच्या विरोधापुढे मोदी सरकारला नमते घ्यावे लागले. भूसंपादन वटहुकूम मागे घेतला जाणे हा आनंदाचा दिवस आहे. हा सर्व देशातील जनतेचा मोठा विजय आहे. - नितिश कुमार, बिहार मुख्यमंत्री