शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

३९ भारतीयांचे प्रकरण सरकार दडपतेय - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 2:16 AM

इराकमधील ३९ भारतीयांच्या मृत्यू प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने डेटा चोरीचे प्रकरण समोर आणले आहे, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : इराकमधील ३९ भारतीयांच्या मृत्यू प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने डेटा चोरीचे प्रकरण समोर आणले आहे, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. या ३९ भारतीयांच्या मृत्यूच्या प्रकरणाच्या बातम्या दडपण्यासाठीच भाजपा व केंद्र सरकारने डेटाचोरीच्या बातम्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे ते म्हणाले.पीएनबी बँकेतील घोटाळा, एससी, एसटी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमधील तरतूदी सौम्य करणे आणि इराकमध्ये मारल्या गेलेल्या कुटुंबांकडून उपस्थित करण्यात येत असलेले प्रश्न यावरुन सध्या काँग्रेसने सरकारला लक्ष्य केले आहे.काँग्रेसचे प्रवक्तेरणदीप सुरजेवाला म्हणाले की, हे ३९ भारतीय लोक मारले गेले आहेत, याचे पुरावे सरकारकडे असूनही सरकार ते जिवंतच आहेत, असे त्यांच्या नातेवाईकांना सांगत होते. मोसूलमध्ये अपहरण झालेल्या ३९ भारतीयांबाबत मोदी सरकार देशाची दिशाभूल का करत होते? असा सवालही त्यांनी केला आहे.सरकारने लावला नवा शोधराहुल गांधी यांनी व्टिट केले की, ‘३९ भारतीयांचा मृत्यू झाला. सरकार खोटे बोलत आहे. डेटाचोरीचे प्रकरण काढून काँग्रेसबाबत नवाच शोध लावला आहे. ३९ भारतीय रडारवरून गायब. समस्या समाप्त’.त्यांच्या मृत्यूची तारीख सांगामोदी सरकार आणि सुषमा स्वराज यांनी ४ वर्षे दिशाभूल का केली? असे या मृत व्यक्तींची कुटुंबे विचारत आहेत. सरकारने या लोकांच्या मृत्यूची तारीख का नाही सांगितली? नुकसानभरपाईबाबत सरकार का सहमत नाही? या ३९ भारतीयांचा मृत्यू काही वर्षापूर्वीच झाला होता. तरीही मोदी सरकारने या व्यक्तींच्या कुटुंबांना फसविले, खोटे बोलले अशी टीकाही सुरजेवाला यांनी केली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी