शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

३९ भारतीयांचे प्रकरण सरकार दडपतेय - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 02:16 IST

इराकमधील ३९ भारतीयांच्या मृत्यू प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने डेटा चोरीचे प्रकरण समोर आणले आहे, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : इराकमधील ३९ भारतीयांच्या मृत्यू प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने डेटा चोरीचे प्रकरण समोर आणले आहे, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. या ३९ भारतीयांच्या मृत्यूच्या प्रकरणाच्या बातम्या दडपण्यासाठीच भाजपा व केंद्र सरकारने डेटाचोरीच्या बातम्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे ते म्हणाले.पीएनबी बँकेतील घोटाळा, एससी, एसटी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमधील तरतूदी सौम्य करणे आणि इराकमध्ये मारल्या गेलेल्या कुटुंबांकडून उपस्थित करण्यात येत असलेले प्रश्न यावरुन सध्या काँग्रेसने सरकारला लक्ष्य केले आहे.काँग्रेसचे प्रवक्तेरणदीप सुरजेवाला म्हणाले की, हे ३९ भारतीय लोक मारले गेले आहेत, याचे पुरावे सरकारकडे असूनही सरकार ते जिवंतच आहेत, असे त्यांच्या नातेवाईकांना सांगत होते. मोसूलमध्ये अपहरण झालेल्या ३९ भारतीयांबाबत मोदी सरकार देशाची दिशाभूल का करत होते? असा सवालही त्यांनी केला आहे.सरकारने लावला नवा शोधराहुल गांधी यांनी व्टिट केले की, ‘३९ भारतीयांचा मृत्यू झाला. सरकार खोटे बोलत आहे. डेटाचोरीचे प्रकरण काढून काँग्रेसबाबत नवाच शोध लावला आहे. ३९ भारतीय रडारवरून गायब. समस्या समाप्त’.त्यांच्या मृत्यूची तारीख सांगामोदी सरकार आणि सुषमा स्वराज यांनी ४ वर्षे दिशाभूल का केली? असे या मृत व्यक्तींची कुटुंबे विचारत आहेत. सरकारने या लोकांच्या मृत्यूची तारीख का नाही सांगितली? नुकसानभरपाईबाबत सरकार का सहमत नाही? या ३९ भारतीयांचा मृत्यू काही वर्षापूर्वीच झाला होता. तरीही मोदी सरकारने या व्यक्तींच्या कुटुंबांना फसविले, खोटे बोलले अशी टीकाही सुरजेवाला यांनी केली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी