शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सहा वर्षे, चार प्रयत्न; तरीही मोदी सरकार 'ही' कंपनी विकण्यात अपयशी; अधिकाऱ्यांना घाम फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 20:58 IST

विक्रीचे प्रयत्न अनेकदा करूनही हात रिकामेच; मोदी सरकारच्या पदरी पुन्हा अपयश

मुंबई: सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करण्याचा सपाटा मोदी सरकारनं लावला आहे. अनेक सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विक्रीला काढण्यात आला आहे. या माध्यमातून लाखो कोटी रुपये उभारण्याचं लक्ष्य सरकारनं ठेवलं आहे. निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेला वेग देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. मात्र सहा वर्षांत वारंवार प्रयत्न करूनही मोदी सरकारला एका कंपनीची विक्री करता आलेली नाही.

सरकारच्या मालकीची हेलिकॉप्टर पुरवठादार कंपनी असलेल्या पवनहंसची विक्री प्रक्रिया पुन्हा थांबली आहे. पवनहंसची विक्री प्रक्रिया थांबण्याची ही चौथी वेळ आहे. पवनहंससाठी बोली लावणाऱ्या कंपन्यांच्या समूहापैकी एक असलेल्या अल्मस ग्लोबलविरोधात एनसीएलटीनं आदेश जारी केला. त्यानंतर कंपनीचा विक्री व्यवहार स्थगित करण्यात आला.

एनसीएलटीकडून काढण्यात आलेल्या आदेशाचं कायदेशीर परीक्षण सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं दिली. पवनहंसच्या विक्रीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. गेल्याच महिन्यात या प्रक्रियेसाठी मेसर्स स्टार९ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडची निवड करण्यात आली. यामध्ये आणखी चार कंपन्या सहभागी आहेत. पैकी अल्मस ग्लोबलविरोधात एनसीएलटीनं गेल्याच महिन्यात एक आदेश जारी केला. कोलकातास्थित असलेल्या या कंपनीनं आपल्या कर्जदारांना स्वीकृत समाधान प्रस्तावानुसार पैसे न दिल्याचा आरोप कंपनीवर आहे.

पवनहंस विकण्यासाठी गेल्या ६ वर्षांपासून सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र कंपनी विकता विकता अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे. पवनहंसमधील गुंतवणूक काढून घेण्यासाठी सरकारनं आतापर्यंत चार प्रयत्न केले. चारही अपयशी ठरले. पवनहंसकडे ४२ हेलिकॉप्टर आहेत. पवनहंसच्या हेलिकॉप्टर्सना आतापर्यंत अनेकदा अपघात झाला आहे.