शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

सरकारलाच अजून सिनेमा समजलेला नाही

By admin | Updated: November 25, 2014 01:18 IST

सरकारला सिनेमा म्हणजे काय याची जाणीव नाही. कतरिना कैफ व शाहरूख खान यांचा सिनेमा म्हणजेच खरा सिनेमा असा सरकारचाही समज झाला आहे.

दिग्दर्शक सुभाष घई यांची टीका : फसव्या मार्केटिंगमुळे संस्कृतीचे नुकसान
पणजी : सरकारला सिनेमा म्हणजे काय याची जाणीव नाही. कतरिना कैफ व शाहरूख खान यांचा सिनेमा म्हणजेच खरा सिनेमा असा सरकारचाही समज झाला आहे. त्यामुळे सिनेमाचा दर्जा तर घसरत तर आहेच; पण त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचेही नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी देशातील सिनेमाबाबत पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केले.
‘उद्याचा सिनेमा’ या विषयावर झालेल्या ‘मास्टर क्लास’मध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. घई म्हणाले की, सिनेमा हा समाजाचे प्रतिबिंब मांडतो. भारतीय सिनेमा सत्यजीत राय यांच्या नावाने ओळखला जातो; कारण त्यांच्या सिनेमांत भारताचे प्रतिबिंब उमटले. नवीन कलाकारांना सिनेसृष्टीत संधी मिळत नाही; कारण सिनेतारकांच्या मुलांनीच सिनेसृष्टीवर अधिराज्य प्रस्थापित केले आहे.
दिग्दर्शक भवन लाल यांनी सिनेमाविषयी आपल्या भावना सांगितल्या. ते म्हणाले, सगळ्यात जास्त मान कलाकाराला मिळतो; कारण कलाकार हा सगळ्यात सुशिक्षित माणूस असतो. भारतात सिनेमा हा धर्म आहे. सिनेमा हे समाजाचे प्रतिबिंब असले तरी सिनेमा म्हणजे तंत्रज्ञान व व्यवसायही आहे. सिनेमा म्हणजे कल्पना आणि नवनिर्मिती आहे. ‘सोने की चिडीया’वाला देश ‘रोटी कपडा और मकान’ सिनेमांवर येऊन समाप्त झाला; कारण हीच आता गरज बनली आहे, असे घई म्हणाले. सिनेमा हा देशाचा सर्वात मोठा राजदूत आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतात सांस्कृ तिक मंत्र्यांना काडीचीही किंमत नाही. भारताची संस्कृती हाच उद्याचा सिनेमा आहे. असे सिनेमा आले नाही तर ‘हॅपी न्यू ईयर’सारखेच सिनेमा चालत राहणार. मार्केटिंग ही एक फसवणूक आहे आणि आपला सिनेमा मार्के टिंगमुळे निम्न पातळीवर घसरला आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)