शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

सरकारलाच अजून सिनेमा समजलेला नाही

By admin | Updated: November 25, 2014 01:18 IST

सरकारला सिनेमा म्हणजे काय याची जाणीव नाही. कतरिना कैफ व शाहरूख खान यांचा सिनेमा म्हणजेच खरा सिनेमा असा सरकारचाही समज झाला आहे.

दिग्दर्शक सुभाष घई यांची टीका : फसव्या मार्केटिंगमुळे संस्कृतीचे नुकसान
पणजी : सरकारला सिनेमा म्हणजे काय याची जाणीव नाही. कतरिना कैफ व शाहरूख खान यांचा सिनेमा म्हणजेच खरा सिनेमा असा सरकारचाही समज झाला आहे. त्यामुळे सिनेमाचा दर्जा तर घसरत तर आहेच; पण त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचेही नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी देशातील सिनेमाबाबत पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केले.
‘उद्याचा सिनेमा’ या विषयावर झालेल्या ‘मास्टर क्लास’मध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. घई म्हणाले की, सिनेमा हा समाजाचे प्रतिबिंब मांडतो. भारतीय सिनेमा सत्यजीत राय यांच्या नावाने ओळखला जातो; कारण त्यांच्या सिनेमांत भारताचे प्रतिबिंब उमटले. नवीन कलाकारांना सिनेसृष्टीत संधी मिळत नाही; कारण सिनेतारकांच्या मुलांनीच सिनेसृष्टीवर अधिराज्य प्रस्थापित केले आहे.
दिग्दर्शक भवन लाल यांनी सिनेमाविषयी आपल्या भावना सांगितल्या. ते म्हणाले, सगळ्यात जास्त मान कलाकाराला मिळतो; कारण कलाकार हा सगळ्यात सुशिक्षित माणूस असतो. भारतात सिनेमा हा धर्म आहे. सिनेमा हे समाजाचे प्रतिबिंब असले तरी सिनेमा म्हणजे तंत्रज्ञान व व्यवसायही आहे. सिनेमा म्हणजे कल्पना आणि नवनिर्मिती आहे. ‘सोने की चिडीया’वाला देश ‘रोटी कपडा और मकान’ सिनेमांवर येऊन समाप्त झाला; कारण हीच आता गरज बनली आहे, असे घई म्हणाले. सिनेमा हा देशाचा सर्वात मोठा राजदूत आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतात सांस्कृ तिक मंत्र्यांना काडीचीही किंमत नाही. भारताची संस्कृती हाच उद्याचा सिनेमा आहे. असे सिनेमा आले नाही तर ‘हॅपी न्यू ईयर’सारखेच सिनेमा चालत राहणार. मार्केटिंग ही एक फसवणूक आहे आणि आपला सिनेमा मार्के टिंगमुळे निम्न पातळीवर घसरला आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)