शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रास्त्रे उत्पादक, पुरवठादारांना तयार राहण्यास सरकारचे संकेत

By admin | Updated: October 10, 2016 20:55 IST

शस्त्रास्त्रे पुरवठादारांना आणि शस्त्रास्त्रे उत्पादकांना उत्पादन वाढविण्यास आणि अत्यंत कमी कालावधीत पुरवठा करण्यास तयार राहण्यास सांगितले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १० : भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या महिन्यात केलेल्या लक्ष्यभेदी लष्करी कारवाईनंतर पाकिस्तान-भारत यांच्यात तणाव वाढला आहे. सरकारने या पार्श्वभूमीवर शस्त्रास्त्रे पुरवठादारांना आणि शस्त्रास्त्रे उत्पादकांना उत्पादन वाढविण्यास आणि अत्यंत कमी कालावधीत पुरवठा करण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अशा सूचना गेल्या काही दिवसांत अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिल्या गेल्याला दुजोरा दिला. सशस्त्र दलांकडून आलेल्या तातडीच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठीची कार्यक्षमता आणि क्षमता तपासून घ्या, असे त्यांना सांगण्यात आले आहे.

शस्त्रास्त्रे पुरवठादारांशी गरज भासल्यास तातडीने अतिरिक्त शस्त्रांच्या पुरवठ्यासाठी करार केले जाऊ शकतात, असे कळविण्यात आले आहे. शस्त्रास्त्रे पुरवठ्याच्या उद्योगाची ऐनवेळी आलेल्या मागणीची पूर्तता करण्याची, सध्याचे उत्पादन वाढविण्याची आणि कमी वेळेत सूचना दिल्यावर त्याची पूर्तता करण्याची खरोखर क्षमता किती हे सरकारला जाणून घ्यायचे आहे, असे संरक्षण विभागातील वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्याचा हवाला देऊन आलेल्या वृत्तात म्हटले आहे. केंद्र सरकारकडून अशा प्रकारच्या सूचना येण्याची ही काही पहिली वेळ नाही.

यावर्षी जानेवारी महिन्यात पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही सरकारने अशी चौकशी केली होती. संरक्षण मंत्रालयाला छोटी शस्त्रे आणि दारुगोळा तसेच सुखोई आणि मिराज या लढावू विमानांसाठी सुटे भाग तातडीने हवे आहेत. २९ सप्टेंबर रोजी लक्ष्यभेदी लष्करी कारवाई झाली. त्याच्या आदल्या दिवशी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सुरक्षेच्या गरजा भागविण्यासाठी संरक्षण खर्चात वाढ केली जाऊ शकते, असे संकेत दिले होते. टंचाई (विशेषत: छोटी शस्त्रे आणि दारुगोळा) दूर करण्यास सशस्त्र दलांचे प्राधान्य आहे.

पूर्ण स्वरुपात युद्ध सुरू झाल्यास काही दिवसांनंतर ते पुढे सुरू ठेवण्यास टंचार्ईमुळे मर्यादा येतात. चीनच्या सीमेवर लष्कराच्या नव्या युनिट्सना उभारण्याच्या कामात युद्धात लागणाऱ्या साठ्यात घट झाली. तो साठा एवढा कमी झाला आहे की खरोखर युद्ध पेटलेच तर काही बाबतीत तो चार दिवसही पुरणार नाही.