शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

शासनाने साखर उद्योग अडचणीत आणू नये

By admin | Updated: October 9, 2016 00:42 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : १० नोव्हेंबरलाच हंगाम सुरू करणे आवश्यक; मजुरांचे स्थलांतर होण्याची भीती

सातारा : ‘चुकीचे धोरण आणि चुकीचे नियम लादून साखर उद्योग आणखी अडचणीत आणण्याचा उद्योग केंद्र आणि राज्य शासनाकडून सुरू आहे. साखर कारखान्यांनी १ डिसेंबरनंतर गळीत हंगाम सुरू करण्याचा नवीन फतवा राज्य शासनाने काढला आहे. १० नोव्हेंबरपर्यंत गळीत हंगाम चालू न झाल्यास मजुरांचे स्थलांतर, उसाची पळवापळवी होईल. उसाचे वजन आणि साखर उताऱ्यावर परिणाम होतील आणि पर्यायाने साखर उद्योग आणि शेतकरी अडचणीत सापडणार आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून १० नोव्हेंबरपर्यंत गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी द्यावी,’ असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, साखर कारखान्यांना गळीत हंगाम सुरू करताना ऊस तोडणी मजूर, वाहतूक व्यवस्था आदी प्रमुख बाबींचे काटेकोर नियोजन करावे लागते. या नियोजनानुसार गळीत हंगाम नोव्हेंबर १० ते १५ तारखेपर्यंत चालू होणे आवश्यक असते. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात गळीत हंगाम सुरू झाल्यास कारखान्याला परिपक्व ऊस मिळतो. त्यामुळे चांगला साखर उतारा मिळून दर्जेदार साखर उत्पादन होते. पर्यायाने शेतकऱ्यांना किफायतशीर दर देता येतो. मात्र, ऊस उत्पादन कमी होणार असल्याचे कारण पुढे करून राज्य शासनाने यंदाचा गळीत हंगाम १ डिसेंबरनंतर चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे साखर उद्योगापुढे अनेक समस्या निर्माण होणार आहेत. गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्यास तोडणी मजूर हाताला काम नसल्याने कामासाठी स्थलांतर करतील. त्यामुळे कारखान्यांना मजूर उपलब्ध होणार नाहीत. तसेच महाराष्ट्रात हंगाम उशिरा सुरू होण्याचा गैरफायदा कर्नाटकमधील साखर कारखाने घेतील. त्यामुळे उसाची पळवापळवी होईल. यामुळे महाराष्ट्रातील साखर उद्योग अडचणीत सापडणार आहे. उशिरा हंगाम सुरू झाल्यास उसाच्या वजनात घट होईल. पर्यायाने साखर उताऱ्यावर परिणाम होऊन साखर उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. उसाची उपलब्धता गृहीत धरूनच साखर कारखान्यांनी गळीत हंगामाचा कालावधी ठरवलेला असतो. (प्रतिनिधी) निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज...१ डिसेंबरनंतर हंगाम चालू झाल्यास साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाचे नियोजन कोलमडणार असून, शेतकऱ्यांचा काढणीस आलेला ऊस शेतात उभा राहिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. साखर उद्योग आणि शेतकऱ्यांची गैरसोय आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गळीत हंगाम १० ते १५ नोहेंबरपर्यंत चालू होणे अत्यावश्यक आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून राज्य शासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी आग्रही मागणीही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.