शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

सरकारी नोकरभरती आॅनलाईन पद्धतीने

By admin | Updated: May 1, 2016 01:50 IST

सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया योजनेवर आधारित

नवी दिल्ली : सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया योजनेवर आधारित या योजनेच्या अंमलबजावणीनंतर अर्जदारांना सरकारी कार्यालयांच्या खेट्या घालणे आणि तातडीने व्हेरीफिकेशनसाठी लाच देण्याची गरज पडणार नाही.उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्यापासून तर नियुक्तीपर्यंत कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांला सामोरे जावे लागणार नाही, हे विशेष! सचिवांच्या एका गटाने जानेवारी महिन्यात भरती प्रक्रिया आॅनलाईन करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार सरकारने हे पाऊल उचलले आहे. १२ सचिवांच्या या गटात कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे सचिव संजय कोठारी आणि विदेश सचिव एस. जयशंकर यांचा समावेश होता. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, कार्मिक मंत्रालयाचे सचिव या योजनेच्या तातडीने अंमलबजावणीसाठी सचिव गटाच्या शिफारशींचा दर आठवड्याला आढावा घेत आहेत. केंद्रातील सर्व सचिव आणि राज्यांच्या मुख्य सचिवांसमक्ष ही योजना मांडण्यात आली आहे.याशिवाय अर्जदारांना प्रमाणपत्रांच्या मूळ अथवा छायांकित प्रती देण्याचीही गरज पडणार नाही. ते आपले प्रमाणपत्र डिजिटल लॉकरमध्ये अपडेट करू शकतील. तेथून सरकारला गरज पडल्यास हे दस्तावेज आॅनलाईन मिळू शकतील. डिजिटल लॉकरमध्ये अपलोड केलेले प्रमाणपत्रच पुरेसे असतील आणि संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन असेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)