शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

सरकार चर्चेसाठी तयार, पण विरोधकांनी गोंधळ थांबवावा - व्यंकय्या नायडू

By admin | Updated: November 18, 2016 14:16 IST

नोटाबंदीच्या मुद्यावर सरकार चर्चेस तयार असतानाही विरोधक का गोंधळ घालत आहेत असा सवाल व्यंकय्या नायडूंनी विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांच्या संसदेतील गदारोळामुळे सरकार नाराज असून या गोंधळी भूमिकेबद्दल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्याने राज्यसभा दुपारपर्यंत तर लोकसभा सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली.
' आम्ही (सरकार) चर्चेसाठी तयार आहोत. तरीही विरोधक गोंधळ का घालत आहेत हे समजत नाहीये. ते (विरोधक) मुद्यापासून भरकटत असून चर्चेपासून पळ काढत आहेत', असा आरोपही नायडू यांनी केला. ' गरज पडल्यावर पंतप्रधान स्वतः सभागृहात उपस्थित राहतात आणि चर्चेत सहभागी होतात. पण या मुद्यावरून गोंधळ माजवत कामकाज बंद पाडणे हे अत्यंत चुकीचे आहे' अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. तसेच उरी हल्ल्याबाबत गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत केलेल्या विधानावर काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही नायडू यांनी केली.