शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी तेल कंपन्यांची 26 हजार कोटींची लूट!

By admin | Updated: July 20, 2014 01:05 IST

गेल्या पाच वर्षात ग्राहकांवर 26 हजार 626 कोटी रुपयांचा जादा बोजा टाकला, असा ठपका भारताचे नियंत्रक व महालेखपाल (कॅग) यांनी ठेवला आहे.

नवी दिल्ली: इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी तेल कंपन्यांनी स्वयंपाकाचा गॅस, केरोसीन, डीङोल आणि पेट्रोल या उत्पादनांची किरकोळ विक्रीची किंमत ठरविताना प्रत्यक्षात न केलेल्या काल्पनिक खर्चाच्या बाबी हिशेबात धरून गेल्या पाच वर्षात ग्राहकांवर 26 हजार 626 कोटी रुपयांचा जादा बोजा टाकला, असा ठपका भारताचे नियंत्रक व महालेखपाल (कॅग) यांनी ठेवला आहे.
सरकारी तेल कंपन्यांच्या किंमत निर्णारण पद्धतीविषयीचा ‘कॅग’चा हा अहवाल शुक्रवारी संसदेत सादर झाला. एकीकडे ग्राहकांवर असा अतिरिक्त बोजा टाकत असतानाच या सरकारी तेल कंपन्यांनी एस्सार ऑईल आणि रिलायन्स इन्डस्ट्रिज या खासगी कंपन्यांकडून जादा दराने तेल खरेदी करून त्यांना 667 कोटी रुपयांचा अवाजवी फायदा करून दिला, असेही या अहवालात नमूद केले गेले आहे.
‘कॅग’चा अहवाल म्हणतो की, मार्च 2क्12 र्पयतच्या पाच वर्षात तेल कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांची किंमत ठरविताना विमा, जहाजभाडे, सागरी वाहतुकीतील हानी इत्यादी बाबींवरील खर्च 5क्,513 कोटी रुपये गृहित धरला. मात्र प्रत्यक्षात त्यांनी जेवढे तेल आयात केले होते त्यावर या बाबींसाठी फक्त 23,887 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. म्हणजेच किंमतीमधील एवढय़ा रकमेचा अवास्तव बोजा ग्राहकांवर टाकण्यात आला.
आयात केलेले तेल देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यास पुरेसे नसले की सरकारी तेल कंपन्या खासगी कंपन्यांकडून तेल घेतात. 2क्क्7 ते 2क्क्12 या काळात सरकारी तेल कंपन्यांनी सुद्धिकरण केलेल्या तेलापैकी 2क् टक्के तेल अशा प्रकारे खासगी कंपन्यांकडून घेतलेले होते. म्हणजेच या तेल खरेदीच्या खर्चात विमा, जहाज वाहतूक, सागरी वाहतुकीत होणारी हानी अशा बाबी नव्हत्या. तरीही विकलेल्या सर्वच तेलाची किंमत हा खर्च सरसकट गृहित धरून ठरविली गेल्याने ग्राहकांना तेवढय़ा प्रमाणात जादा किंमत मोजावी लागली होती.
खासगी कंपन्यांना झालेल्या अवाजवी लाभाच्या संदर्भात अहवाल म्हणतो की, सरकारी तेल कंपन्या सर्व खर्च जमेस धरून त्यांना आयात तेल ज्या किंमतीला पडते त्याच किंमतीत खासगी कंपन्यांकडूनही तेल खरेदी करतात. वस्तुत: आयात करताना होणारा खर्च देशांतर्गत खरेदीच्या वेळी होत नसतो. अशा प्रकारे जास्त किंमत दिली गेल्याने हायस्पीड डीङोल या एकाच उत्पादनाच्या बाबतीत त्यांनी वर्ष 2क्11-12 या एकाच वर्षात खासगी कंपन्यांना 667 कोटी रुपये अवाजवी दिले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
मुंबई विमानतळातही तोटा
च्मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खासगी-सरकारी भागिदारीच्या (पीपीपी) माध्यमातून विकास करून घेण्याच्या कंत्रटात सरकारी महसूल आणि विमान प्रवासी यांचे हित वा:यावर सोडल्याबद्दलही ‘कॅग’ने नागरी विमान वाहतूक मंत्रलयावर ताशेरे ओढले आहेत. हे कंत्रट जीव्हीके समुहाच्या मुंबई इंटरनॅशन एअरपोर्च लि. या कंपनीस देण्यात आले. 
च्या कामास चार वर्षाचा विलंब होऊन मूळ खर्च 5,8क्क् कोटी रुपयांवरून वाढून 12,4क्क् कोटी रुपयांवर गेला. तरीही मंत्रलयाने खासगी कंपनीस 
दंड आकारणी केली नाही, त्यांच्याकडून झालेला विलंब पदरात घातला आणि महसुलातील तूट भरून काढण्यासाठी, मूळ कंत्रटात समाविष्ट नसलेले विशेष विकास शुल्क लावण्यास परवानगी देऊन, विमान प्रवाशांनाच,या विलंबाचा व खर्चवाढीचा बोजा सोसायला लावला, असे अहवालात म्हटले आहे.