शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

मोदी सरकार गरिबांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; लवकरच महत्त्वाची घोषणा होणार?

By कुणाल गवाणकर | Updated: October 27, 2020 11:40 IST

pmgky scheme: तिसऱ्या पॅकेजमधून मोठी घोषणा होण्याची शक्यता

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असला तरीही अद्याप अर्थव्यवस्था रुळावर आलेली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा थेट परिणाम उद्योगधंद्यांवर झाला. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तर कित्येकांना अद्यापही पगार कपात सहन करावी लागत आहे. त्यामुळे मागणी घटली आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे लवकरच मोदी सरकार तिसऱ्या पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.सध्याच्या घडीला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत गहू, तांदूळ आणि चणाडाळ मोफत दिली जाते. लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर ही योजना सुरू झाली. सुरुवातीला तिची मर्यादा जूनपर्यंत होती. त्यानंतर ती नोव्हेंबरपर्यंत वाढवली गेली. आता यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक सुरक्षेसाठी राबवण्यात येणारी ही योजना मार्चपर्यंत सुरू राहू शकते.पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'वर पुन्हा डिसलाईक्सचा पाऊस; कमेंट्समधून तीव्र नाराजी व्यक्तकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारनं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली. सरकारनं एकदा या योजनेला मुदतवाढ दिली आहे. आता पुन्हा योजनेचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे. लाईव्ह मिंटनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. प्रोत्साहन पॅकेज ३.० मध्ये मागणी वाढवण्यावर आणि सामाजिक सुरक्षा देणाऱ्या उपायांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं दिल्याचं मिंटनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे."पाकिस्तान, चीनविरुद्ध कधी युद्ध पुकारायचं ते पंतप्रधान मोदींनी निश्चित केलंय"तिसऱ्या प्रोत्साहन पॅकेजच्या माध्यमातून सरकार २० कोटी जन-धन खात्यांमध्ये आणि ३ कोटी गरीब, ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांच्या खात्यांत रोख रक्कम थेट जमा करू शकतं. ही रोख मदतही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा भाग असेल.प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत काय काय येतं..?- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत एका व्यक्तीला एका महिन्याला ५ किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळतात. या योजनेचा फायदा जवळपास ८१ कोटी लोकांना मिळत असल्याचा सरकारचा दावा आहे.- याशिवाय १९.४ कोटी कुटुंबांना दर महिन्याला १ किलो चणे मोफत दिले जातात.- राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत या अन्न धान्याचं वाटप करण्यात येत आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी