शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
5
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
6
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
7
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
8
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
9
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
10
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
11
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
12
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
13
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
14
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
15
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
16
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
17
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
18
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
19
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
20
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी

सरकार-न्यायालय वादात न्यायदान व्यवस्था संकटात

By admin | Updated: June 1, 2016 03:46 IST

मोदी सरकारच्या २ वर्षांच्या कारकिर्दीत देशाची न्यायव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक संकटात आहे. कोट्यवधी दावे व खटले कोर्टात प्रलंबित अवस्थेत आहेत.

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीमोदी सरकारच्या २ वर्षांच्या कारकिर्दीत देशाची न्यायव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक संकटात आहे. कोट्यवधी दावे व खटले कोर्टात प्रलंबित अवस्थेत आहेत. सरकार व न्यायालयांच्या तांत्रिक वादामुळे हजारो न्यायाधिश व शेकडो न्यायमूर्तींच्या नेमणुका रखडल्या. त्यामुळे एकूण न्यायदान व्यवस्थेवरही विपरीत परिणाम जाणवतो आहे.उच्च व सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांच्या प्रक्रियेत बदल करण्यास मोदी सरकारने जुनी कॉलेजियम व्यवस्था बदलण्याचा धाडसी प्रयोग केला. नॅशनल ज्युडिशिअल अ‍ॅपाँर्इंटमेंट कमिशन (एनजेएसी) ही घटनात्मक अधिकार असलेली व्यवस्था निर्माण करण्याचा कायदा संसदेत २0१४ साली मंजूर केला. कॉलेजियम व्यवस्थेत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसह चार ज्येष्ठ न्यायमूर्तींना हायकोर्ट व सुप्रिम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या नियुक्त्या, व बदल्यांची शिफारस करण्याचे अधिकार होते. मोदी सरकारने न्यायमूर्तींच्या नेमणुका व बदल्यामंधे अधिक पारदर्शकता आणण्याचा दावा करीत व केंद्रीय विधी मंत्रालयाला त्यात आवश्यक हस्तक्षेप करण्याचे अधिकार मिळवण्याच्या हेतूने आॅगस्ट २0१४ मधे ६ सदस्यांच्या एनजेएसीकडे ते अधिकार सोपवण्याचा निर्णय घेतला. एनजेएसीच्या ६ सदस्यांमधे केंद्रीय कायदा मंत्री, सुप्रिम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींसह दोन ज्येष्ठ न्यायमूर्ती व देशातल्या २ नामवंत मान्यवरांचा समावेश होता. सुप्रिम कोर्टाने मात्र ही नवी व्यवस्था साफ अमान्य केली व एप्रिल २0१५ एनजेएसी कायदा रद्दबातल ठरवला. भारतात सध्या १0 लाख लोकांमागे १0 ते १२ न्यायाधिश असे प्रमाण आहे. ते १0७ पर्यंत वाढवावे अशी विधी आयोगाची शिफारस आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस)च्या धर्तीवर भारतीय न्यायालयीन सेवा (इंडियन ज्युडिशिअल सर्व्हिस) सुरू करण्याचा प्रस्ताव अजूनही विचाराधीनच आहे. ही सेवा सुरू झाली तर किमान कनिष्ट न्यायालयांना प्रतिवर्षी अधिक गुणवत्ता असलेले न्यायाधिश मिळू शकतील.केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाने अलीकडेच प्रसृत केलेल्या आकडेवारीनुसार २0१५ सालच्या अखेरपर्यंत देशातल्या विविध न्यायालयात ३.५0 कोटींहून अधिक खटले प्रलंबित आहेत. सुप्रिम कोर्टात ६६ हजार ७१३, विविध हायकोर्टात ४९ लाख ५७ हजार ८३३ आणि जिल्हा व तालुका स्तरांवरील कनिष्ट न्यायालयांमधे २ कोटी ७५ लाख ८४ हजार ६१७ प्रलंबित दावे व खटल्यांची २0१५ अखेरपर्यंतची संख्या आहे.