शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

सरकार-न्यायालय वादात न्यायदान व्यवस्था संकटात

By admin | Updated: June 1, 2016 03:46 IST

मोदी सरकारच्या २ वर्षांच्या कारकिर्दीत देशाची न्यायव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक संकटात आहे. कोट्यवधी दावे व खटले कोर्टात प्रलंबित अवस्थेत आहेत.

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीमोदी सरकारच्या २ वर्षांच्या कारकिर्दीत देशाची न्यायव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक संकटात आहे. कोट्यवधी दावे व खटले कोर्टात प्रलंबित अवस्थेत आहेत. सरकार व न्यायालयांच्या तांत्रिक वादामुळे हजारो न्यायाधिश व शेकडो न्यायमूर्तींच्या नेमणुका रखडल्या. त्यामुळे एकूण न्यायदान व्यवस्थेवरही विपरीत परिणाम जाणवतो आहे.उच्च व सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांच्या प्रक्रियेत बदल करण्यास मोदी सरकारने जुनी कॉलेजियम व्यवस्था बदलण्याचा धाडसी प्रयोग केला. नॅशनल ज्युडिशिअल अ‍ॅपाँर्इंटमेंट कमिशन (एनजेएसी) ही घटनात्मक अधिकार असलेली व्यवस्था निर्माण करण्याचा कायदा संसदेत २0१४ साली मंजूर केला. कॉलेजियम व्यवस्थेत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसह चार ज्येष्ठ न्यायमूर्तींना हायकोर्ट व सुप्रिम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या नियुक्त्या, व बदल्यांची शिफारस करण्याचे अधिकार होते. मोदी सरकारने न्यायमूर्तींच्या नेमणुका व बदल्यामंधे अधिक पारदर्शकता आणण्याचा दावा करीत व केंद्रीय विधी मंत्रालयाला त्यात आवश्यक हस्तक्षेप करण्याचे अधिकार मिळवण्याच्या हेतूने आॅगस्ट २0१४ मधे ६ सदस्यांच्या एनजेएसीकडे ते अधिकार सोपवण्याचा निर्णय घेतला. एनजेएसीच्या ६ सदस्यांमधे केंद्रीय कायदा मंत्री, सुप्रिम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींसह दोन ज्येष्ठ न्यायमूर्ती व देशातल्या २ नामवंत मान्यवरांचा समावेश होता. सुप्रिम कोर्टाने मात्र ही नवी व्यवस्था साफ अमान्य केली व एप्रिल २0१५ एनजेएसी कायदा रद्दबातल ठरवला. भारतात सध्या १0 लाख लोकांमागे १0 ते १२ न्यायाधिश असे प्रमाण आहे. ते १0७ पर्यंत वाढवावे अशी विधी आयोगाची शिफारस आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस)च्या धर्तीवर भारतीय न्यायालयीन सेवा (इंडियन ज्युडिशिअल सर्व्हिस) सुरू करण्याचा प्रस्ताव अजूनही विचाराधीनच आहे. ही सेवा सुरू झाली तर किमान कनिष्ट न्यायालयांना प्रतिवर्षी अधिक गुणवत्ता असलेले न्यायाधिश मिळू शकतील.केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाने अलीकडेच प्रसृत केलेल्या आकडेवारीनुसार २0१५ सालच्या अखेरपर्यंत देशातल्या विविध न्यायालयात ३.५0 कोटींहून अधिक खटले प्रलंबित आहेत. सुप्रिम कोर्टात ६६ हजार ७१३, विविध हायकोर्टात ४९ लाख ५७ हजार ८३३ आणि जिल्हा व तालुका स्तरांवरील कनिष्ट न्यायालयांमधे २ कोटी ७५ लाख ८४ हजार ६१७ प्रलंबित दावे व खटल्यांची २0१५ अखेरपर्यंतची संख्या आहे.