शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सरकार लोकशाहीचा गळा घोटतेय : सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 05:33 IST

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत संसदेबाहेर आपले मत व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी संसदेतील १४३ विरोधी सदस्यांच्या निलंबनावरून बुधवारी सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत संसदेबाहेर आपले मत व्यक्त केले. यापूर्वी कधीही इतक्या विरोधी खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले नव्हते आणि तेही केवळ न्याय्य मागणीसाठी. 

त्या म्हणाल्या की, १३ डिसेंबरला जे घडले ते अक्षम्य आहे. सभागृहात फलक झळकावल्याबद्दल आणि घोषणाबाजी केल्याबद्दल गेल्या काही दिवसांत लोकसभा आणि राज्यसभेतून एकूण १४३ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. संसदेच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींबाबत गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून निवेदनाची मागणी इंडिया आघाडीचे खासदार करत आहेत. 

बेरोजगारीवर चर्चा का होत नाही : राहुल गांधीतृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सभापती धनखड यांची नक्कल केल्याच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्षांच्या सुमारे १५० खासदारांना संसदेबाहेर काढण्यात आले; पण त्यावर कोणतीही चर्चा माध्यमांमध्ये होत नाही. बेरोजगारीवर चर्चा होत नाही. राफेलसह अनेक मुद्द्यांवर चर्चा होत नाही. 

मी आरोप केला तर ते योग्य होईल का?...प्रत्येक गोष्टीत कोणीही जातीचा ओढूनताणून संबंध आणू नये. मागासवर्गीय असल्याने मला राज्यसभेत अनेकदा बोलू दिले जात नाही, असा मी आरोप केला तर ते योग्य होईल का?. माझी नक्कल करून जाट असल्याचा अवमान केला आहे, असा आरोप उपराष्ट्रपती धनखड यांनी केला होता. अशी विधाने करणे योग्य आहे का. -मल्लिकार्जुन खरगे, पक्षाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी