शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

सरकार लोकशाहीचा गळा घोटतेय : सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 05:33 IST

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत संसदेबाहेर आपले मत व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी संसदेतील १४३ विरोधी सदस्यांच्या निलंबनावरून बुधवारी सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत संसदेबाहेर आपले मत व्यक्त केले. यापूर्वी कधीही इतक्या विरोधी खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले नव्हते आणि तेही केवळ न्याय्य मागणीसाठी. 

त्या म्हणाल्या की, १३ डिसेंबरला जे घडले ते अक्षम्य आहे. सभागृहात फलक झळकावल्याबद्दल आणि घोषणाबाजी केल्याबद्दल गेल्या काही दिवसांत लोकसभा आणि राज्यसभेतून एकूण १४३ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. संसदेच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींबाबत गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून निवेदनाची मागणी इंडिया आघाडीचे खासदार करत आहेत. 

बेरोजगारीवर चर्चा का होत नाही : राहुल गांधीतृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सभापती धनखड यांची नक्कल केल्याच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्षांच्या सुमारे १५० खासदारांना संसदेबाहेर काढण्यात आले; पण त्यावर कोणतीही चर्चा माध्यमांमध्ये होत नाही. बेरोजगारीवर चर्चा होत नाही. राफेलसह अनेक मुद्द्यांवर चर्चा होत नाही. 

मी आरोप केला तर ते योग्य होईल का?...प्रत्येक गोष्टीत कोणीही जातीचा ओढूनताणून संबंध आणू नये. मागासवर्गीय असल्याने मला राज्यसभेत अनेकदा बोलू दिले जात नाही, असा मी आरोप केला तर ते योग्य होईल का?. माझी नक्कल करून जाट असल्याचा अवमान केला आहे, असा आरोप उपराष्ट्रपती धनखड यांनी केला होता. अशी विधाने करणे योग्य आहे का. -मल्लिकार्जुन खरगे, पक्षाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी