शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
3
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
4
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
5
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
6
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
7
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
8
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
9
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
10
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
11
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
12
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
13
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
14
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
15
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
16
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
17
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
18
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
19
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
20
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक

मोदींची ‘पसंती’ जपताना सरकार सापडले खिंडीत

By admin | Updated: July 12, 2014 02:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र यांच्या नियुक्तीचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

शीलेश शर्मा - नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र यांच्या नियुक्तीचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. नियम गुंडाळून केलेली ही नियुक्ती वैध ठरविण्यासाठी लोकसभेत सादर करण्यात आलेले भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) दुरुस्ती विधेयक 2क्14 पारित करून घेताना सरकारला घाम फुटला आहे. राज्यसभेत सरकारजवळ बहुमत नाही. तशात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने या विधेयकावर तीव्र आक्षेप घेतल्याने हे विधेयक संमत करण्यावरून सरकारची चिंता वाढली आहे. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी हे दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले तेव्हा त्यास झालेला जोरदार विरोध ही वाद चिघळण्याची नांदी मानली जात आहे. 
काँग्रेसने या मुद्दय़ावर विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सरकारचे हे दुरुस्ती विधेयक पारित होण्यापासून रोखावे की केवळ विरोध दर्शवून ते पारित होऊ द्यावे, याबाबत काँग्रेसचा निर्णय अद्याप झालेला नाही. बिजद आणि अण्णाद्रमुक यांनी या दुरुस्ती विधेयकाला विरोध करीत काँग्रेसला साथ दिली तर राज्यसभेत हे विधेयक नामंजूर करून काँग्रेस रालोआ सरकारवर मात करेल. परंतु त्याची शक्यता कमीच आहे, असे सूत्रंनी सांगितले. आपला विरोध नृपेंद्र मिश्र यांना नाही, तर एका व्यक्तीसाठी अध्यादेश जारी करून ट्राय कायदा बदलण्याचे काम करीत असलेल्या सरकारच्या कार्यपद्धतीला आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकाजरुन खरगे, शशी थरूर, अभिषेक मनु सिंघवी यांचे म्हणणो आहे. एका व्यक्तीच्या नियुक्तीसाठी सरकारने चक्क अध्यादेश जारी करण्याची भारताच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. ट्रायच्या नियमानुसार मिश्र यांची नियुक्ती असंवैधानिक आहे. ही नियुक्ती संवैधानिक बनविण्यास विधेयकाद्वारे दुरुस्ती करण्यात येत आहे. यावरून आता राजकारण पेटले आहे. 
 
ट्राय कायद्यानुसार ट्रायचा अध्यक्ष आणि सदस्यांना सेवानिवृत्तीनंतर केंद्र वा राज्य सरकारमध्ये कोणत्याही पदावर नियुक्ती करण्यास प्रतिबंध आहे. ट्रायचे अध्यक्षपद भूषविलेल्या नृपेंद्र मिश्र यांच्या नियुक्तीमध्ये हीच अडचण आल्याने सरकारने आधी 28 मे रोजी अध्यादेश काढला आणि आता ट्राय कायदा दुरुस्ती विधेयक सादर केले आहे. कायद्यानुसार, निवृत्तीनंतर कधीही असे पद भूषविण्यास मज्जाव आहे. त्याऐवजी निवृत्तीनंतर दोन वर्षे कोणतेही पद स्वीकारण्यास मज्जाव करणारी दुरुस्ती सरकारने आणली आहे. हे विधेयक मंजूर झाले तर निवृत्तीला दोन वर्षे उलटून गेल्याने वादात अडकलेली मिश्र यांची नियुक्ती कायद्याच्या कचाटय़ात सापडणार नाही.