शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 18:07 IST

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर टीका केली.

Asaduddin Qwaisi: बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरुन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमधील मतदार यादीतील घोळ आणि पहलगाम हल्ल्यवरुन केंद्रावर जोरदार निशाणा साधला. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे आणि 'ऑपरेशन सिंदूर' चालू ठेवले पाहिजे असंही असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला होता. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बिहार निवडणुकीशी याचा संबंध जोडत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या हल्ल्याला गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हटले. बांगलादेशी-रोहिंग्या बिहारमध्ये असल्याचे आपल्याला कळतं, पण दहशतवादी पहलगाममध्ये कसे पोहोचले हे आम्हाला माहित नाही, असं म्हणत ओवैसींनी टीका केली. तेलंगणाच्या निजामाबादमध्ये एका सभेत ओवैसी बोलत होते.

"जर तुम्हाला या देशावर प्रेम असेल तर मला भाजपवाल्यांनो सांगा की हे सत्य नाही का भारताला खरा धोका पाकिस्तानपासून आहे, भारताला धोका चीनपासून आहे. चीन आणि पाकिस्तान बांगलादेशात घुसले आहेत. देशाला ज्यांच्याकडून धोका आहे त्यांच्याकडे लक्ष द्या, तुम्ही देशात काय करत आहात? चीन भारताला सर्व बाजूंनी वेढत आहे. बांगलादेश सीमेवर, चीन बांगलादेशच्या लोकांसाठी एक हवाई पट्टी बांधत आहे. भारतातून उभे राहून पाहू शकता. भारताचा शत्रू आपल्या दारावरआहे आणि आता भारतात कोणीतरी म्हणत आहे, हे करू नका, ते करू नका, घर पाडा, बुलडोझर चालवा, मशीद उखडून टाका, हे काय सुरु आहे?," असा सवाल असदुद्दीन ओवैसींनी केला.

"पहलगाममध्ये आपल्या २६ हिंदू बांधवांना चार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मारले आणि तिथले राज्यपाल आता जुलै महिन्यात म्हणत आहेत की मी जबाबदार आहे. जर तुम्ही जबाबदार असाल तर पद सोडून द्या आणि निघून जा. दहशतवादी पहलगाममध्ये कसे पोहोचले? तुम्ही म्हणता की बिहारमध्ये बांगलादेशी, रोहिंग्या आहेत, तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती आहे. मग ते चार दहशतवादी पहलगाममध्ये कसे पोहोचले हे मला सांगा, तुम्ही झोपला होता का? तुमचे प्रशासन डोळे मिटून बसले होते. जेव्हा तुम्ही मतदार यादीच्या नावाखाली बांगलादेशी रोहिंग्या आहेत म्हणता, तेव्हा पहलगामचा बदला घ्यावा लागेल आणि ऑपरेशन सिंदूर चालू ठेवावे लागेल. जोपर्यंत ते चार दहशतवादी पकडले जात नाही, जोपर्यंत ते मारले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही तुम्हाला जाब विचारत राहू," असंही ओवैसी म्हणाले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदी