शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

ह्रॅलो-३ हरमलातील गतिरोधकाबाबत शासन उदासीन ग्रामस्थांत नाराजी

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

हरमल : येथील पंचायत क्षेत्रातील अधिकतर अपघातप्रवण क्षेत्रात गतिरोधक निर्माण करावेत, अशा आशयाचे ग्रामसभा ठराव मंजूर करून पाठविल्यास वर्षे उलटली. तरीही शासन दखल घेत नसल्याने खात्याच्या उदासीनतेबद्दल ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हरमल : येथील पंचायत क्षेत्रातील अधिकतर अपघातप्रवण क्षेत्रात गतिरोधक निर्माण करावेत, अशा आशयाचे ग्रामसभा ठराव मंजूर करून पाठविल्यास वर्षे उलटली. तरीही शासन दखल घेत नसल्याने खात्याच्या उदासीनतेबद्दल ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अलीकडे हरमल पंचायत क्षेत्रातील तिठानजीकचे मासळी मार्केट बामणभाटी आगरनजीक स्थलांतर केले. तिठा भागातील वाहतूक कोंडी सुटली आणि दररोजची कटकट दूर झाली, असे वाटत होते. तरीही सध्या मार्केटनजीक वाहनधारक आपली वाहने रस्त्यावरच पार्क करून ठेवीत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अपघाताची श्क्यता अधिक असल्याने माजी पंच दिलीप वस्त यांनी गतिरोधक उभारण्याच्या ठराव मंजूर करून घेतला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय त्याबाबत उदासीन असल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करतात.
मुख्य रस्ता ते खालचावाडा समुद्रकिनारा रस्ता हा नेहमीच गजबजलेला असतो. या रस्ता मार्गात प्रवीण वायंगणकर यांच्या निवासस्थानासमोरील धोकादायक वळणावर दर पर्यटन हंगामात कित्येक अपघात घडत असतात. त्या प्रकारच्या अपघाताची दखल घेत प्रवीण वायंगणकर यांनी १० वर्षांपूर्वी त्या धोकादायक वळणावर गतिरोधक उभारण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला होता. संबंधित खात्यास तो मंजुरीसाठी पाठविला; परंतु खात्याने अद्याप त्याची दखल घेतली नाही.
दरम्यान, अलीकडे साधारण नारायणदेव जंक्शन, बामणभाटी शंकर नाईक, शंभू वायंगणकर यांच्या निवासस्थानानजीक, मधलावाडा मेथर यांच्या निवासस्थानाजवळ, केपकरवाडा वळणावर आदी ठिकाणी गतिरोधकाची मागणी आहे. मात्र, मांद्रे पंचायत क्षेत्रात काही गतिरोधक अनावश्यक वाटतात. हे गतिरोधक निर्माण करताना हरमल पंचायत क्षेत्राचा विचार केला नसल्याने संबंधित खाते निष्क्रिय असल्याची टीका नागरिक करतात. तरी जिल्हाधिकारी व वाहतूक खात्याने हरमल ग्रामस्थांच्या मागणीची दखल घ्यावी, अशी मागणी सर्व लोकांनी केली आहे. (प्रतिनिधी)