शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवरील कर्ज साडेचार वर्षांत ८२ लाख कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 06:17 IST

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून गेल्या साडेचार वर्षांत सरकारवरील कर्ज ४९ टक्के वाढून ८२ लाख कोटी रुपये झाले आहे.

नवी दिल्ली : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून गेल्या साडेचार वर्षांत सरकारवरील कर्ज ४९ टक्के वाढून ८२ लाख कोटी रुपये झाले आहे. सरकारवरील कर्जाची अवस्था सांगणाऱ्या दस्तावेजाचा आठवा अहवाल शुक्रवारी प्रसिद्धीस दिला गेला, त्यात ही माहिती आहे.सप्टेंबर २०१८ अखेरची माहिती त्यात उपलब्ध असून, त्याच्याशी तुलना केल्यास ही रक्कम ८२,०३,२५३ कोटी रुपये आहे. हीच रक्कम जून २०१४ अखेर ५४,९०,७६३ कोटी रुपये होती, असे सरकारने घेतलेल्या कर्जाची माहिती देताना अर्थमंत्रालयाने सांगितले. सरकारवरील सार्वजनिक कर्ज गेल्या साडेचार वर्षांत ४८ लाख कोटी रुपयांवरून ७३ लाख कोटी रुपये (५१.७ टक्के वाढ) झाले व त्याचा परिणाम अंतर्गत कर्जात ५४ टक्के वाढ होऊन ते ६८ लाख कोटी रुपये होण्यात झाला. बाजारातून घेतल्या जाणाºया कर्जातही याच साडेचार वर्षांत ४७.५ टक्के वाढ होऊन ते ५२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले. सुवर्ण रोख्यांच्या माध्यमातून घेतलेले कर्ज जून २०१४ मध्ये शून्य होते. ते सुवर्ण मुद्रीकरण योजनेसह (गोल्ड मोनिटायझेशन स्कीम) ९,०८९ कोटी झाले. या दस्तावेजात केंद्र सरकारने भारत सरकारच्या एकूण कर्ज परिस्थितीचे तपशीलवार विश्लेषण केले आहे. २०१०-२०११ पासून अर्थमंत्रालय सरकारी कर्जाच्या अवस्थेची माहिती दरवर्षी देत असते. सरकारच्या आर्थिक व्यवहारातील आर्थिक तुटीचा तपशीलही त्यात आहे.>तूट भरून काढायला कर्जाचा आधारसरकार प्रामुख्याने त्याच्या आर्थिक तुटीला भरून काढण्यासाठी बाजाराशी जोडलेल्या कर्जाचा आधार घेते. देशाचे कर्ज वाढत असताना चालू आर्थिक वर्षात आर्थिक तुटीच्या बाजूने फारच थोड्या मदतीची अपेक्षा आहे. आर्थिक तूट पहिल्या आठ महिन्यांत नोव्हेंबरपर्यंत ७.१७ लाख कोटी किंवा पूर्ण वर्षाच्या लक्ष्याच्या ६.२४ लाख कोटी रुपयांच्या ११४.८ टक्के होती.